पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[२१]

 मद्तीनें संपत्तीचा मोठा वांटा पटकवितात. यामुळें गरीब लोकांस जीवापाड श्रम करूनही पोटापुरता संपत्तीचा वांटा मिळत नाहीं; व म्हणूनच त्यांना हालांत, दुःखांत व एकंदर दैन्यांत दिवस कंठावे लागतात. म्हणून संपत्तीची वांटणी न्यायाची केल्यास व प्रत्येक मनुष्यानें आपल्या उपजीविकेकरितां श्रम करावयाचेच असा निश्चय केल्यास सर्वत्र सुख व शांति नांदेल; व असें एकदां झालें म्हणजे सर्वाना आपलीं मनें सुसंस्कृत करण्यास वेळ मिळेल. देशांत सर्व लोक सुखी व ज्ञानवान् होतील. मग गुन्हे, दुःख, हाल वगैरे सर्व अनिष्ट प्रकार समाजांतून नाहीसे होऊन सर्वत्र स्त्ययुगास सुरुवात होईल. अशा प्रकारच्या विचारसरणींतील एक ढोबळ चूक दाखविण्याकरितां मालथस यानें आपला निबंध लाहला. मालथसच्या मतें ही घोडचूक म्हणजे मानवी स्वभावांतल्या एका प्रवृतीची विस्मृति होय. मालथसनें असें दाखविलें कीं, असा समाज स्थापन झाला आहे अशी कल्पना केली तरी हें सत्ययुग शाश्वत टिकणारें नाहीं. पुनः कलियुगास प्रारंभ झालाच पाहिजे. कारण, सर्व मनुष्यांची सुस्थिति आहे असें मानलें म्हणजे प्रत्येक मनुष्य लग्र करील. कां कीं, विवाहाची प्रवृति मनुष्याला उपजत आहे व प्रत्येक कुटुंबाची सुस्थिति आहे असें मानलें म्हणजे मानवी प्राण्याच्या प्रजोत्पादनशक्तीला अमर्यादित मुभा मिळेल. मनुष्याला लागणारें अन्न गणितश्रेढीनें वाढतें तर मनुष्यची वाढ भूमितिश्रेष्टीनें होते. यामुळे मनुष्यें इतकीं वाढतील कीं, सर्वांना अन्न मिळण्याची पंचाईत पडून पुनः जीवनार्थकलह सुरू होईल व सदृढ मनुष्यें आपल्याला जास्त संपत्ति मिळवितील व संपत्तीची विषमता व त्यापासून होणारें दुःख व हालअपेष्टा हीं जगांत अवतरतील. तेव्हां ज्या कारणानें या मनुष्यस्वभावांतील सत्ययुग नाहीसें होईल त्याच कारणानें असें सत्ययुग अस्तित्वांतच येणार नाहीं. तेव्हां जगांत लोकसंख्या मर्यादित राहण्यास दुष्काळ, सांथ, आजार, दुःखे वगैरे स्वाभाविक आपत्ती व अनीति, लढाया वगैरे कृत्रिम आपत्ती या पाहिजेत. तेव्हां ही लोकसंख्या मर्यादित करणारीं सक्षात् कारणें म्हणजे सृष्टीक्रमांतील एक आवश्यक भागच आहे.

    या पुस्तकाबद्दल मालथसवर धर्माभिमानी लोकांकडून अतोनात टीका झाली. कारण, त्याच्या विचारसरणीप्रमाणें दुष्काळादि कारणें