पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१४]

 सत्तेमुळे फ्रान्समधील बहुतेक सुखवस्तु व श्रीमंत वर्ग हे करापासून मुक्त झाले होते. व राजाच्या चैनीचा अवाढव्य खर्च, राज्यकारभाराचा खर्च व कोलबर्टसारख्या मुत्सद्याच्या एकपक्षी लोकहिताच्या धोरणानें कला-कौशल्याच्या उत्तेजनाचा खर्च-हा सर्व अवाढव्य खर्च मुख्यतः शेतक-यांवर व गरीब लोकांवर पडे. कारण, फ्रान्समध्यें त्या काळीं सरकारच्या उत्पन्नाच्या मुख्य चार बाबीच असत. पहिली बाब दरवर्षी शेतक-याच्या ऐपतीप्रमाणें आकाराला जाणारा जमिनीवरील कर. हा कर फक्त शेतकरी व शेत कसणारे यांवरच पडे हें वर सांगितलेंच आहे. दुसरी 'बाब मिठावरील जबर कराची. हा करही गरीब लोकांच्या वरच जास्त पडे हें उघड आहे. तिसरी बाब देशांतील आयातनिर्गत मालावरील जकाती व प्रांताप्रांतामधील आयातनिर्गत मालावरील जकाती; व शेवटची बाब म्हणजे सार्वजनिक रस्त्यावरील पट्टया. अर्थात् या सर्व बाबीचा मुख्य बोजा गरीब रयतेवर व विशेषतः शेतकरीवर्गावरच पडे.
 यामुळे फ्रान्समध्यें सामान्य लोकांची स्थिति फारच वाईट झाली होती. परंतु राजा व त्याच्या भोंवतालची मंडळी व वरच्या वर्गाचे लोक यांची सर्व प्रकारे चैन व आबादानी होती. या सर्व सामाजिक, राजकीय व औद्योगिक कारणांनीं फ्रान्समध्ये त्या काळीं सरकार व समाजव्यवस्था हीच आनिष्ट आहे व मनुष्याची स्वाभाविक व नैसर्गिक स्थिति हीच जास्त सुखकर आहे अशाप्रकारच्या कल्पना फैलावत चालल्या. त्यांतच इंग्लंडमधल्या लॉक वगैरे तत्त्वज्ञानच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनांची भर पडून फ्रान्सांत विचारक्रांति होत होती. या कारणांनी वया क्रांतीपासून या नव्या विचाराच्या खळबळीतंच अर्थ्शास्त्रांतला निसर्गपंथ उदयास आला. या पंथाचीं राजकीय व सामाजिक मते तंत्त्वेत्त्यांसाराखींच होतीं.मनुष्य हा स्वभावतः स्वातंत्त्र्यप्रिय प्राणी आहे व त्याला पुष्कळ नैसर्गिक हक्क आहेत.अगदीं रानटी स्थितींत 'बळी तो कान पिळी'हा न्याय असल्यामुळें कोणत्याही व्यक्तीला आपले स्वाभाविक हक्क उपभोगितां येण्याची खात्री नसते म्हणून मनुष्यें आपले बाकीचे हक्क राखण्याकरीतां थोड्याश्या स्वातंत्र्यावर पाणी सोडून तें स्वातंत्र्य सरकारच्या हातांत देतात तेंव्हा सरकार हें समाजाला अत्यावश्यक आहे; परंतु तें एक अवश्यक अनिष्टांपैकी आहे.परंतु सरकारला व्यक्तीचे कांही स्वभाविक हक्क कधींच हिरावून घेतां येत नाही