पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. V$3. केवळ परावलंबी बनणें चांगलें नाहीं. राजाची सत्ता मोठी आहे, पण प्रजेजवळ जी अल्पसत्ता आहे, ती एकवट करून प्रजेनें राजास मदत करणें, किंवा आपल्या समाजास उपयोगीं पडणारी कामें अIपण खतां करू लागणे, कांहीं वाईट नाहीं. सर्व प्रजा निमील्यवत् झाल्यास, तिचा परिणाम जनतेस तसा राजसतेसही घातकच होईल. प्रजेनें आपली अल्पशक्ति एकत्र करून, ‘र्थेबें थेबै तळे सांचे' या न्यायानें, तिच्यापासून मोठे कार्यं करण्याची आमची परंपरागत चाल, सोडून देणें चांगलें नाहीं. आपल्या हिताच्या गोष्टी कोणत्या, अहिताच्या गोष्टी कोणत्या, हिताच्या गोष्टी करण्याकरितां सरकारापासून मदत मिळवावयाची, अहिताच्या गोष्टी सरकार करीत आहे असे वाटल्यास, एकमतानें आपलें ह्मणणें सरकाराच्या कानावर घालावयाचे, हें करण्यास भिण्याचे कारण नाहीं. ३१ सरकार ज्या गोष्टी करतें, त्या रयतेच्या हिताकरितां करतें, पण केव्हां केव्हां त्या फाजील लाड करणाच्या आईबापांच्या कृत्याप्रमाणे असण्याचा संभव असतो. अशा वेळीं त्यांतील कमतरपणा, रयतेनें एकमतानें सरकारास दाखवावा व दुरुस्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. आमच्या समाजाच्या सुखास कोणत्या गोष्टी कारण आहेत, कोणत्या नुसत्या भ्रामक आहेत; सरकारची मदत कोणत्या गोष्टींकरितां मागावयाची; आपल्या आपण कोणत्या गोष्टी करावयाच्या; समाजाचें ऐक्य व्हावें ह्मणून काय केलें पाहिजे, खदेश ह्मणजे काय, खदेशप्रीति ह्मणजे काय, त्याकरितां आपण काय केलें पाहिजे, याबद्दल आपण पूर्ण माहिती करून घ्यावी; व समाजसुखाकरितां समाजानें एकवटून काम करण्याची आपली संवय वाढवावी. ३२ सरकारी कामें सरकारी कामदारांच्या धोरणानें चालावयाचीं. त्यांचे धोरण रयतेच्या धोरणाशीं नेहमीं मिळेलच, असें म्हणतां येणार नाहीं. एखाद्या ठिकाणीं पटकीसारख्या घातक रोगानें प्रवेश केल्यास, त्या रोगाचा प्रतिबंध करण्याची सरकारची तयारी होतां होतां व वरिष्ठ अंमलदारांकडे रिपोर्ट जातां येतां, बराच वेळ लागतो, पण लोकांनी मनांत आणल्यास, त्यांस एकम wo