हे पान प्रमाणित केलेले आहे.
२७
तर त्यांपासून फारसा फायदा होण्याचा संभव *नाहीं. ह्यावरून
उघड होते की, पाऊस पुष्कळ पडण्यापेक्षां पडलेल्या पावसाचे
पाणी वाहून जाऊ न देतां ते सांठवून ठेवण्याकरितां तजविजी
योजणे हे अत्यवश्यक आहे.
--------------------
-----
*बेळगांव जिल्ह्यापैकीं गोकाकच्या कालव्याची अशाच प्रकारची स्थिति झाली आहे. कांहीं दिवसपावेतों ह्या कालव्याचे पाणी जमीन पिकविण्याकरितां सरकार लोकांस देऊ लागले होते. परंतु, पुढे कालव्याचे कांहीं पाणी एका गिरणीस द्यावे लागल्यामुळे कालव्यामध्ये पाणी अपुरे होऊन तो निरुपयोगी झाल्यासारखा आहे.