पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



८७

 पावसाचे पडलेले पाणी साठून कसे राहतें हें वर केलेल्या विवरणावरून स्पष्ट झालेच. अशा रीतीने उच्च प्रदेशी पाणी सांठले गेल्याने, झऱ्यांंस पाण्याचा पुरवठा जास्त होऊन पाणीही पुष्कळ दिवस टिकते. नद्या, ओढे, तळी, विहिरी ह्या सर्वांस प्रत्यक्ष अगर परंपरेनें झऱ्यांंपासून पाणी प्राप्त होते, हे वर निर्दिष्ट केले आहे. म्हणून झऱ्यांंस पाण्याचा पुरवठा पुष्कळ झाला, म्हणजे त्याबरोबर नद्या, ओढे, तळीं, विहिरी ह्यांसही पाण्याचा पुरवठा जास्त झाला पाहिजे; व ती पावसाळा संपल्यावर पुष्कळ दिवसपर्यंत वाहती राहिली पाहिजेत. पाण्याचा पुरवठा विपुल झाला म्हणजे बागाईत करण्यास मार्ग झाला. म्हणून इरिगेशन खात्याचा उद्देश तो कित्येक जागेमध्ये फारच स्वल्प उपायाने म्हणजे उच्च प्रदेशी झाडे लाविल्याने सिद्धीस जातो.

 दुसरें, इरिगेशन खात्याकडून नद्या वगैरे ह्यांस आडवे बांध घालून जे पाणी आडवले गेले असते, त्यास वारंवार पाण्याचा पुरवठा कमी पडल्यामुळे कालव्यापासून जितका फायदा व्हावा, म्हणजे जितकी जास्त जमीन भिजावी तितकी भिजत नाहीं. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे झाडे लाविली असतां इरिगेशन खात्यासही मदत होणार आहे. सारांश, पावसाचे पाणी सांठून राहणे ह्याची आपणांस किती अवश्यकता आहे, हे मागें एक वेळा सांगितलेंच आहे. ही अवश्यकता झाडांच्या वृद्धीपासून आपणांस साध्य करून घेता येते.

 ह्या आपल्या उष्ण देशांत जेथे नियमित काळीं मात्र पाऊस