गेला. तसेंच लार्द लैव्ह, लार्द वेलस्ली, लार्द हेस्तिस्
व लार्द दलहौसी हे ४ पुरुष वरील काळांत ध्यानांत
ठेवण्यासारखे झाले. पहिल्यानें ब्रिटिश सत्ता पूर्व किना-
व्यावर मद्रासपासून कलकत्त्यापर्यंत स्थापिली; दुसरा व
तिसरा ह्यांनी मराठ्यांची सत्ता नष्ट करून देशाच्या
मध्यभागीं व पश्चिम किनाऱ्यावर सत्ता स्थापिली; व
चौथ्यानें वायव्येकडील प्रदेशांत सत्ता स्थापून ब्रिटिश
सरहद्द सिंधु नदी पर्यंत वाढविली.
शेवटीं हिंदुस्थानांतील इंग्लिशांच्या इतिहासासंबंधानें
४ काळ विशेष लक्षांत ठेवण्यासारखे आहेत, असे दिसू-
न येईल. १ ला काळ लार्द क्लैव्हचा. ह्या काळांत
वरील इतिहासा- मुख्यत्वें ३ गोष्टी घडल्या त्याः- (१) फ्रेंच
चे मुख्य काळ. लोकांचा पराजय; (२) इंग्लिश शिपाई व
नेटिव्ह शिपाई ह्यांच्या एकत्र सैन्यानें नेटिव्ह राजाचा
केलेला पहिला पराजय; व ( ३ ) नेटिव्ह राजाच्या वतीनें
बंगाल प्रांताच्या राज्यकारभाराचा कंपनीने केलेला स्वी-
कार. २ रा काळ वारन हेस्तिग्स्चा. कंपनीच्या अंतः-
स्थितीची सुधारणा व इंग्लिश कामगारांनी राज्यव्यवस्थे-
ची केलेली उत्तम सुधारणा, ह्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या
काळांत घडल्या. ३रा काळ इ. स. १८५८ हा
होय. कंपनीचा शेवद आणि इंग्लिश राष्ट्राकडून सर्व
राज्याकारभाराचा स्वीकार, ह्या गोष्टी ह्या काळांत घडल्या.
४ था काळ इ. स. १८७७. ह्यांत राणी सरकाराने
"हिंदुस्थानी बादशाहीण" असा किताब घेतला.