पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४४ )

 परंतु वरील लढायांतून इंग्लिशांसच नेहमीं जय कसा मिळत गेला, असा प्रश्न साहजिकच उप्तन्न होतो. ह्या देशांतील लोकांपेक्षां इंग्लिश लोक शूर होते, एव-

लढायांतून इंग्लि-
शांसच नेहमीं जय
कां मिळत गेला?

ढ्याच उत्तरानें ह्या प्रश्नाचें समाधान होत नाहीं. कारण स्वयंपाक, बाजा- रची नेआण, व इतर हलक्या प्रकारची श्रमाचीं कामें हीं इंग्रजांकडून ह्या उष्ण देशांत झालींच नसतीं; व अर्थात् हीं करण्यास जर त्यांना एतद्देशीय चाकर मिळाले नसले, तर त्यांना उपाशीं मरण्याचाच प्रसंग आला असता. तेव्हां अशा स्थितीत त्यांच्या नुसत्या शौर्याचा काय उपयोग झाला असता? ह्यावरून त्यांचा नेहमीं जय होण्याचें शौर्याखेरीज आणखी कांहीं कारण असले पाहिजे हे उघड आहे. शिवाय, त्यांनी ज्या लढाया जिंकिल्या त्या ज्या सैन्याच्या जोरा- वर जिंकिल्या, त्या सैन्यांत सर्व इंग्लिश लोकच होते काय? हमेषा नेटिव्ह शिपायांची संख्या इंग्लिश शिपा- यांच्या संख्येच्या कधीं तिप्पट, कधीं पांच पट, अशी असे. ह्यास्तव सैन्यांतील इंग्लिश व नेटिव्ह शिपायांच्या संख्यांच्या प्रमाणाकडे लक्ष दिलें असतां असें दिसून येईल कीं, नेटिव्ह संस्थानिकांचा इंग्लिशांनी मुख्यत्वें नेटिव्ह शिपायांच्या जोरावरच पराजय केला आहे. साधारणपणे म्हटलें असतां त्यांच्या जयाची कारणे २ होतीं:~~( १ ) नेटिव्ह राजांचें दौर्बल्य व त्यांच्यांत