परंतु हीं त्याची कृत्यें इंग्लंदांत पसरली तेव्हां
कंपनीच्या अमलाविरुद्ध मोठी ओरड झाली. प्रसिद्ध
वक्ता व मुत्सद्दी जो बर्क साहेब यानें नेटिव्ह लोकांचा
पक्ष घेतला; व हेस्टिंग्स् ह्याला त्याच्या वर्तणुकीबद्दल
दूषण देण्यांत येऊन त्याची चौकशी झाली. पुष्कळ
वर्षे ही चौकशी चालून अखेरीस तो दोषमुक्त झाला.
परंतु प्लासी व वांदिवाश येथील लढाया ज्याप्रमाणें हिंदु-
स्थानच्या इतिहासांत अति महत्त्वाच्या आहेत, त्याचप्र-
माणें ही चौकशीहि फार महत्त्वाची आहे; कारण ह्या
चौकशीमुळे कंपनीच्या अमलांत फार सुधारणा झाली.
आजपर्यंत कंपनीचा अंमल म्हणजे नेटिव्ह लोकांस मोठा
तळतळाट असे; परंतु ह्यापुढें तो सुखप्रद होऊं लागला.
व्यापार करणें व राज्य करणे असे दोन्ही अधिकार
आजपर्यंत कंपनीकडे होते; परंतु ह्यापुढें हे दोन्ही अधि-
कार एकाचकडे असूं नयेत, असें पार्लमेंटानें ठरविलें.
ह्या हालचालीमुळेच " इंदियन सिव्हिल सव्हिस"
(हिंदुस्थानांतील सुलकी काम चालविणाऱ्या अधिकाऱ्यांची
इंदियन सिव्हिल मंडळी ) निघाली. हिंदुस्थानांतील इंग्लिश
सव्हिस, जज्य, माजिस्त्रेट, कलेक्टर व इतर काम-
गार ह्यांचा ह्यांत समावेश होतो. ह्या लोकांचा व्यापा-
राशी कांही संबंध नव्हता. त्यांस चांगला पगार मिळे;
व ह्यामुळे लांच घेण्याचा त्यांस कोणत्याहि प्रकारें मोह
पडत नसे. जे नेटिव्हांवर प्रेम करीत असत, व ईश्वरे-