हिंदुस्थानांतील दुसरा मोठा गव्हर्नर जो वारन
हेस्तिग्स् ह्याच्या कारकीर्दीत पार्लमेंटानें हें प्रकरण हातीं
घेतलें. ह्याच्या कारकीर्दीतच म
कंपनीच्या राज्यव्यव
स्थेसंबंधानें पार्लमेंटानें द्रास,
केलेली सुधारणा.
मुंबई व बंगाल हे तीन इलाखे
ह्या नवीन
एकत्र करून त्यांजवर बंगालच्या
गव्हर्नरास “गव्हर्नर जनरल " असा
हुद्दा देऊन मुख्य नेमण्याचा ठराव झाला.
ठरावाप्रमाणें वारन हेस्तिग्स हाच पहिला गव्हर्नर जनरल
झाला. दुप्लीसारखाच हेस्तिग्स् हुशार होता; व दुप्लीनें
जो बेत योजिला, परंतु जो त्याला सिद्धीस नेतां आला
नाहीं, तो बेत ह्यानें सिद्धीस नेला. कित्येक राजांब-
रोबर त्यानें लढाया केल्या, कित्येकांविरुद्ध त्यानें खल-
बतें केलीं, व सर्व कामांत त्यास यश येत गेलें,
हैदरअल्ली हां एक साहसी शिपाई होता, व त्यानें स्व-
सामर्थ्यानें आपणास म्हैसूरचा सुलतान केलें होतें, आणि
इंग्लिशांस हिंदुस्थानांतून हकलून लावण्याचें भय घातलें
होतें. ह्या हैदरअल्लीपासून त्यानें मद्रासचें संरक्षण केले.
अयोध्येच्या राजाविरुद्ध खलबत करून त्याजपासून त्यानें
अतोनात पैसा उकळिला; व ह्या पैशानें दायरेक्तर लो-
कांचें शांतवन करून हैदरअल्लीशी लढाया करण्यांत आले-
ला खर्च भरून काढिला. आपल्या रयतेस दावांत आण
ण्यासाठीं एखाद्या नेटिव्ह राजानें कंपनीचे शिपाई मदत
घेण्याची इच्छा दर्शविल्यास पैसे घेऊन त्या राजास तो
मदतहि देत असे,