पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३६ )

 नेटिव्ह राजांपासून एखादा प्रांत घेऊन आपल्या स्वत:- च्याच नांवानें त्याचा राज्यकारभार तिनें कधींहि चालविला नाहीं. तिचें कृत्य विशेष सौम्यपणाचें होतें; नेटिव्ह राजांचे मुख्त्यार अशा नात्यानें ती नेहमीं कारभार करी. नेटिव्ह राजांच्या हातांत कवडीचाह अधिकार नसे; तथापि गादीवर ती बाहुली असलीच पाहिजेत, हुकूम त्यांच्या नांवानें सुटत, त्यांच्याच सत्तेनें कर गोळा करीत; परंतु खरोखर हुकूम कंपनी करी, व राजाची खाजगी नेमणूक वजा करून बाकीचा सर्व पैसा कंपनीच्या खजिन्यांत जाई. तिनें लवकरचनेटिव्ह राजांचीं न्यायाचीं कोर्टेहि आपल्या हातांत घेण्यास आरंभ करून न्यायाधीश नेमण्यास सुरुवात केली. हे न्यायाधीश पोलिसांवर देखरेख करीत, व कंपनीचे हुकूम अमलांत आणीत.

 ही राज्यक्रांति बंगाल्यांतील लोकांस प्रथमतः कोणत्याहि प्रकारें हितावह वाटली नाहीं; व तसें होणें साहजिकच होतें. त्यांजवर हे नवीन राज्य करणारे

 म्हटले म्हणजे इंग्लिश व्यापा-यांची कंपनी. हिचा मुख्य उद्देश काय तो पसा गाळा करण्याचा. आपल्या भाडवलांवर व्याज काय सुटतें, हाच काय तो त्यांचा नेहमींचा मुख्य विचार. शिवाय, जितका पैसा इंग्लंदांत पाठवितां येईल तितका पाठविण्यास कंपनींतील भागीदार आपल्या हिंदुस्थानांतील मुखत्यारांस निक्षुनु हुकूम करीत.