पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( २४ )

हिंदुस्थानचे आरंभींचे मोगल बादशाह फार हुशार होते. ८ वा हेन्री व आन राणी ह्यांच्या कारकीर्दीच्या दरम्यान, म्हणजे १६ व १७ ह्या शतकांत त्यांनीं हिंदु लोकांस व अफगाण लोकांस जिंकून टाकिलें; आणि कांहीं काळपर्यंत बहुतेक हिंदुस्थान देश आपल्या ताब्यात आणिला. ह्याप्रमाणें हिंदु, अफगाण व मोगल ह्या तिघांच्याच स्वा-या विशेषेकरून लक्षांत ठेवण्यासारख्या आहेत.
मोगलांच्या सत्तेचा ऱ्हास
 आतां दिल्लीच्या मोगल बादशहांच्या अमलाखालीं हिंदुस्थान आलें नाहीं तोंच त्यांच्या अमलांतील मुलूख कमी कमी होत चालला. ह्याचीं कारणें २ होतीं:- १लें कारण, मोगलांचा अंमल पिढीजाद जुलमीच होता, हे होय. ज्या ठिकाणी निरुद्योगाने व विलासाने आयुष्य घालविण्यास फार मोठा मोह उप्तन्न होतो, अशा एशिया खंडांतील देशांत पिढीजाद जुलमी अमलांत सार्वभौम राजांचा स्वभाव हमेषा बिघडतो. पहिला राजा नेहमीं सामर्थवान् असलाच पाहिजे; कारण तो असा नसेल तर त्याला राज्य मिळवितांच कसें येईल ? त्या राजाचा मुलगाहि बहुधा पराक्रमी निघतो; परंतु राजवाड्यांत जन्मलेला, दासदासींनीं जिवापाड श्रम घेऊन वाढविलेला व हरएक प्रकारच्या विलासाची सवय लागलेला असा नातू, अथवा पणतू अतिशय बिघडतो, व फार दुर्बळ