पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( २२ )

मोठाल्या स्वा-या केल्या तेवढ्यांबद्दलच तूर्त विचार करावयाचा आहे. हिंदूंची स्वारी इतक्या प्राचीनकाळीं झाली कीं, त्या स्वारीच्या संबंधानें ध्यानांत ठेवण्यासारख्या गोष्टींचा लेखी इंतिहास उपलब्ध नाही; परंतु इतकें मात्र ठाऊक आहे कीं, हिंदु लोक मध्य एशियांतून हिमालयाच्या खिंडींतून ह्या देशांत आले; आणि त्या आर्य लोकांनीं येथील मूळच्या रहिवाशांस पहाडांत व जंगलांत हाकून देऊन त्यांचे सुपीक प्रदेश बळकाविले.
अफगाण लोकांची स्वारी
 नंतर ह्या देशांत त्यांनीं आपल्या मर्जीप्रमाणें सुधारणा सुरू केली. युरोप खंड ज्या काळीं रानटी स्थितींत होतें, त्या काळीं हिंदुस्थान देश पुष्कळ रीतीनें हल्लीं इतका सुधारलेला होता. तत्वज्ञान, कविता, कला, शिल्पशास्त्र, व उत्तम प्रकारच्या व्यवस्थित मंडळ्या हीं त्या काळ ह्या देशात होती. परंतु साधारण नियमाप्रमाणेच पुढे ह्या देशाची स्थिति झाली. हें सुधारलेलें राष्ट्र निर्बळ झालें; आणि रानटी लोकांच्या टोळ्यांपासून स्वसंक्षरण करण्याचें सामर्थ्य ह्या राष्ट्राच्या आंगीं राहिलें नाही. ह्या हिंदु लोकांनीं ज्याप्रमाणें स्वाच्या केल्या, त्याप्रमाणें स्वा-या करण्यास ते रानटी लोक टपूनच बसले होते. हे रानटी लोक म्हणने अफगाण लोक होत. विल्यम दि काकरर ह्यानें ज्या सुमारास इंग्लंदावर स्वारी केली, त्याच (इ. स. १००० च्या ) सुमारास अफगाण लोकांनीं हिंदुस्थानावर हल्ला केला. अफगाण लोक मुसलमान होते, व