हुंडणावळीचा भाव १८ पेन्सावर टिकवून धरण्याकरितां हिंदुस्योनांतून होणान्या सोन्याच्या निर्गतीवर इतर देशाप्रमाणे निर्बंध घातलें नाहींत, अर्से 'तज्ज्ञांचे मत आहे.
टेरी साहेब आपल्या ग्रंथांत म्हणतात की मोगल बादशहांनी सोने व चांदी परदेशीं पाठविणें हा गुन्हां ठरविला होता व त्या गुन्ह्यास फाशीची शिक्षा ठेवली होती. ( The moghul kings made it a crime not less than capital to export gold and silver ) यावरून मोगल राजघराण्यांचा अंमल इंग्रजांच्या अमलाप्रमाणें हिंदुस्थानच्या आर्थिक अधोगतीस कारणी भू झाला नाहीं. याचे कारण मोगल राजवराणे येथें राज्य स्थापन करतांच आपल्या परिवारासह हिंदुस्थानांतच येऊन राहिले व या देशासच आपली मायभूमि समजूं लागलें. त्याचप्रमाणे त्यांचा नोकरवर्गही येथेंच कायम येऊन राहिला. त्यामुळे येथून परदेशी प्रतिवर्षी ' होम चार्जेस' या सदरा- खाली पैसे पाठविण्याचा प्रश्न नव्हता. तसेंच त्यांचा आपल्या मायभूमीश व्यापार विषयक आपलेपणाचा असा संबंध कांहींच नव्हता.( कारण त्यांचा पूर्वीचा देश हिंदुस्थानपेक्षां मागासलेला होता. ) त्यामुळे त्यांच्या अमदानींत येथील चलन व हुंडणावळ विषयक विशिष्ट व कृत्रिम असें घोरण त्यांनी ठेविलें नाहीं. व त्यामुळे त्यांचे अमदानीत हा देश भिकेसही लागला नाहीं.
परंतु ब्रिटिश अमदानीत, परिस्थिती याच्या अगदी उलट ब्रिटिश लोक येथें पहिल्यांदा आले ते व्यापाराकरितां आले, व तत्कालीन येथील परिस्थितीचा फायदा घेऊन राज्यसूत्रे आपल्या हातांत घेऊन आपला व्यापार वाढविणें त्यांना शक्य झालें, त्यामुळे इंग्लंडची व्यापार वृद्धि जेणें करून येथे होईल तशाच तऱ्हेचें येथील चलन व हुंड- णावळ विषयक धोरण त्यांचे राहिले हे उघड आहे. आतां ते मुत्सदी तर हिंदी जनता भोळी अशी परिस्थिती असल्या कारणाने त्यांना ते चलनव विषयक ठेवीत असलेले घारेण हिंदी जनतेच्या हिताच आहे.