पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आढळते. यावरून द्रविडांची पूर्व वस्ती तिथे होती, हे सिद्ध होते. द्रविडांनी पुढे आर्य संस्कृती स्वीकारली हे लक्षात घेतले की तर्क करण्याची आवश्यकता उरत नाही. गजानन माधव मुक्तिबोधांनी रोचक पध्दतीने सिंधु संस्कृतीचे केलेले वर्णन जिज्ञासूंना अनेक प्रकारची नवी माहिती पुरवत असल्याने हे प्रकरण रंजक झाले आहे.


३. आर्य संस्कृतीचा उगम

 पाच-साडेपाच हजार वर्षांपूर्वी भारताच्या वायव्येस आर्यांच्या अश्वारोही तुकड्या जमू लागल्या. त्या अग्रेसर होताना त्यांना अनेक लढायांना तोंड द्यावे लागले. त्यातून विविध वैचारिक आंदोलनांचा जन्म झाला. त्यातून एका अशा संस्कृतीचा उदय झाला की जिने काळाच्या क्रूर प्रहारांनाही निष्प्रभ केलं. प्रयत्न, संघर्ष, विकास, समन्वय, पुनः संघर्ष अशा दिव्यांशी दोन हात करत भारतीय समाज विकसित झाला' असे रोमहर्षक वर्णन या भागाच्या प्रारंभीच मनाला भिडते नि मुक्तिबोधांच्या भाषा सामथ्र्याची प्रचिती येते.

 देव-दानवसुद्धा, दाशराज्ञ संग्राम, यातून आर्यांना सांस्कृतिक भूमी लाभली ती वैदिक ग्रंथांमुळे. आर्य भारतात येण्यापूर्वी इराणशी भिडले होते. मध्य आशियातून भारतात आगमन झाले. तेव्हा आर्य जाती ही विभिन्न वंशात विभागलेली होती. यदू, सुर्वसु, अनु, द्रुस्य आणि पुरू. पण पख्तून, बलूच प्रांत पादाक्रांत करत आर्य झेलम, चिनाब, रावी, व्यास, सतलज, सरस्वती, सिंधू व सप्तसिंधूना पार करत (त्या वेळी नद्या समुद्रासारख्या होत्या. म्हणून ‘सप्तसिंधु' शब्द प्रचलित होता.) मुक्तिबोधांनी हा ग्रंथ लिहिताना प्राचीन वाङ्मयाचा गाढा अभ्यास केला होता. या सप्तसिंधूची त्यांनी वापरलेली वितस्ता, आसिकनी, परूषणी, विपाशा, शतद्रु, सरस्वती, सिंधू ही नद्यांची नावे याची प्रचिती देतात. तसेच ते प्राचीन जाती, वंशाचे उल्लेख तत्कालीन प्रचलित नावांनी करतात, त्यातूनही हे लक्षात येत राहते. या प्रकरणातून आपणास लक्षात येते की आर्य ही मूलक ग्रामीण संस्कृती होती. गह, उडीद त्यांचं खाद्य होते. सुतार, सोनार, विणकर, व्यवसाय चालायचे. ही कामे दास (गुलाम) करीत. आर्य संस्कृतीत पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था होती. पण स्त्रीस सन्मान दिला जायचा हे मुक्तिबोध पुराव्यानिशी स्पष्ट करतात. विशेष म्हणजे स्त्री, शूद्रांना शिक्षण देऊ नये' असा विचार

साहित्य आणि संस्कृती/७९