पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारत : इतिहास और संस्कृति : मानवोदय ते प्रजासत्ताक भारत


पुस्तकाची भूमिका

 हे इतिहासाचे पुस्तक नाही कारण यात सामान्य इतिहास पुस्तकात असते तीश राजांची युद्धे, राजकीय सत्तांतरे याबाबतचे विवरण नाही. या पुस्तकाचे ते प्रयोजन पण नाही. कारण तो राजकीय इतिहासाचा भाग आहे. समाजाच्या विकासात राजकीय प्रक्रिया महत्त्वाची असते, समाजाला विकसित करण्यात सांस्कृतिक प्रक्रिया पण महत्त्वाची असते. जीवन जसे आहे ते त्यापेक्षा जास्त सुंदर, उदात्त आणि मंगलमय बनवण्याची माणसाची सुरुवातीपासून इच्दा असते. ही इच्छा ज्या वेळी सामाजिक स्वरूप धारण करते त्या वेळी त्यास संस्कृती म्हणतात. त्यात धर्म, नीती, कला, साहित्य यांचा समावेश होतो. संस्कृती समाजाची जीवनदायी शक्ती आहे. राजकीय शक्तीपेक्षा ती जास्त प्रभावी असते. भारतीय समाज त्याचे उदाहरण आहे. तो शेकडो वर्षे गुलामगिरीत राहिला पण आपल्या संस्कृतीच्या ताकदीच्या जीवावर जिवंत राहिला, विकास करीत राहिला.

 याच्या बरोबर सामाजिक विकासाची शक्ती येते. राजकीय उलथापालथ होत राहिली तरी समाजात विकासाची परंपरा चालूच राहते. राजकीय पातळीवर हिंदू व मुसलमान राजांच्यामध्ये युद्ध चालूच रहिली पण सामाजिक पातळीवर हिंद मुसलमान एकमेकांशी बंधुभावाने वागत होते. ते एकमेकांचे विचार, आदर्श,, प्रथा, धार्मिक मान्यता यांचे आदान प्रदान करीत राहिले. एक दुस-यांच्या जीवनास प्राभावित करीत राहिले. मध्ययुगात हिंदू व मुसलमान राजे लढत होते तर मुसलमान कवी ब्रज भाषेत कृष्णकाव्य लिहीत होते व हिंदू-मुसलमान पीर-फकीरांची पूजा करीत होते.

 आपल्या भारतीय समाजाची विकास यात्रा खूपच चित्तवेधक आहे. यात किती तरी बदल झाले. अनेक जातींचे लोक येथे आले व विलीन

साहित्य आणि संस्कृती/७५