पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संजीवन औषधी बनवेल असा मला विश्वास वाटल्यावरूनच हा ग्रंथ प्रपंच केला आहे. त्याचा समारोप मी विष्णू प्रभाकरांच्याच शब्दात करणे पसंत करेन. ते म्हणतात, “अभिमन्यू इस युग में चक्रव्यूह में प्रवेश करने के बाद मरेगा नहीं बल्कि वह इस चक्रव्यूह को छिन्न भिन्न कर देगा और उन सप्त महारथियों को कही ठोर (स्थान) नहीं मिलेगी। वे अपनी मौत मर जायेंगे और आस्था का नन्हा-सा दिया मौसम के तूफानों को झेलता हुआ उसी तरह प्रकाश बिखरता रहेगा सूर्य के आगमन की प्रतीक्षा करता हुआ।"

 सदर ग्रंथातील शेवटचा लेख 'एकात्म भारताचा विचार समारोपपर असून तो स्वतंत्रपणे लिहिण्यात आला आहे.

- डॉ. सुनीलकुमार लवटे

 दि. २५ जून, २०१७

 बंकिमचंद्र चटर्जी जन्मदिन