पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ती सामुदायिक होते. इथे धार्मिक व सामाजिक विधी-निषेध एक दुस-यात गुंतलेले राहतात, असतात. भारतीय समाज अनेक जातींचा होता. एक जात दुस-या जातीत समाविष्ट होत नसे, पण धर्माचं मात्र उलट असायचं. धर्म व्यक्तीला समूहाचा अंश बनवतो. भारतीय समाज म्हणजे अनेक जातींच्या व्यक्तींचा समूह परंतु एखाद्या धर्माचा व्यक्ती म्हणजे एकाच प्रकारच्या विशाल समुदायांचा अंश, जातीत व्यक्तीचं अस्तित्व स्वतंत्र असतं. धर्मात तो समूहाचा प्रतिनिधी असतो.

 मुसलमान धर्म एक संप्रदाय होय. भारतीय समाज संगठनाच्या एकदम विरुद्ध त्याची धारणा झाली आहे. भारतीय समाज जात सुरक्षित ठेवून व्यक्तिगत धर्मसाधनेचे समर्थन करतो, तर मुसलमान धर्म जातरहित समूहगत धर्मसाधनेचा पुरस्कार करतो. एकाचा केंद्रबिंदू चारित्र्य तर दुस-याचा धर्ममत. भारतीय समाजाची ही धारणा पक्की होती की शुद्ध चरित्र व्यक्ती श्रेष्ठ, मग भले तो कोणत्याही जातीचा असो. इस्लाम धर्ममतानुसार आचरण करणारा मुसलमान धर्मात श्रेष्ठ, जो धर्म मानत नाही तो नरकगामी. मुसलमानांच्या आगमनापूर्वी भारतीय समाजाचा कधी अशा धारणेशी संपर्क नव्हता. भारतीय समाजाचा यावर विश्वास नव्हता की, जो जात समुदाय धर्माचार व धर्मसिद्धांत मान्य करीत नाही त्याचे उच्चाटन म्हणजे धर्मकर्तव्य! म्हणून या नव्या धर्मावलंबींनी आपल्या धर्मप्रसारार्थ सर्व जगातील जातगत वैशिष्ट्ये नष्ट करण्याचा चंग बांधला, तेव्हा भारतीय समाजाचे दिङ्मूढ होणे स्वाभाविक होते. त्यामुळे काही काळ त्याची समन्वयवादी बुद्ध कुंठित झाली होती. तो दिग्भ्रमित होता. पण विधात्याला ही कुंठा नि क्रोध अमान्य होता म्हणायचा.

 असे दिसून येते की भारतीय विचारकांना प्रथमच संघबद्ध धर्माचरणाची गरज भासू लागली. खरं म्हणजे मुसलमानांच्या आगमनापर्यंत भारतात असलेल्या विविध जात, संप्रदायांना एक नाव पण नव्हते. या गरजेतून 'हिंदू' नावाचा उदय झाला. हिंदू म्हणजे भारतीय म्हणजेच गैर मुस्लीम होय. या गैर मुस्लीम जनसमुदायात अनेक मतप्रवाह होते. ब्राह्मणवादी, कर्मकांडी, शैव, वैष्णव, शाक्त, स्मार्त शिवाय इतर अनेक संप्रदाय होते. हजारो योजने दूर, हजारो वर्षांचा विस्तार लाभलेला हा विशाल जनसमुदाय विचार परंपरांचे एक गुंतागुंतीचे जंगल होते. स्मृती, पुराण, लोकाचार, कुलाचाराच्या या सुदूर वनस्थळीतून वाट काढणे अशक्यप्राय गोष्ट होती. स्मार्त पंडितांनी हे आव्हान शिरोधार्य मानले. देशातल्या सर्व मतमतांतरांची छाननी सुरू झाली. या सर्वांतून एक समान मत निर्माण करता येते का हे पाहिलं जात होतं. असा

साहित्य आणि संस्कृती/१७७