पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/177

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारतीयही झाले. श्रीमद्भागवतात तर अशा जाती, जमाती, वंशांची यादी देऊन पुढे नमूद करण्यात आले आहे की, ते सर्व पदरी पडले नि पवित्र झाले. यात किरात, हुण, आंध्र, पुलिंद, पुक्कस, अभीर, शुंग, यवन, खस, शक इ. अनेक जाती होत्या की त्या सर्वांची नोंद करणे भागवतकारांनाही अशक्य होऊन गेले.

 भारतीय संस्कृती बाहेरून आलेल्या विविध वंशीय समुदायांना स्वीकारू शकली त्याचे कारण ती प्रारंभापासूनच स्वागतशील, आतिथ्यशील राहिली आहे. त्याचे आणखी एक कारण असे की प्रारंभापासूनच इथे धर्मसाधना (पूजा-अर्चा, परमेश्वर इ.) गोष्टी या ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न मानण्यात आला आहे. प्रत्येकास धर्मोपासनेचे स्वातंत्र्य हे इथले पारंपरिक वैशिष्ट्य होय. समूह, समुदायांनी उत्सव साजरे करता येतात. पूजा मात्र वैयक्तिकच करायची असते. त्यात भजन, कीर्तन आलेच. तुम्ही कोणत्या देव, धर्माला मानता, पूजता यापेक्षा तुमचे चारित्र्य महत्त्वाचे. जर एखादा माणूस पारंपरिकरित्या धर्मदृढ आहे, चारित्र्याने शुद्ध आहे, दुस-या जात, धर्माची नक्कल, अनुकरण नाही करत, परंतु जर तो स्वधर्मात मरणे श्रेयस्कर समजत असेल, प्रामाणिक, सत्यवादी असेल तर त्याला श्रेष्ठ समजलं जायचं. भले मग तो अभीर असो वा पुक्कस. वंश गौण मानला जायचा. आचरणश्रेष्ठता महत्त्वाची होती. कुलीनता पूर्वजन्माधारित मानली जायची, तर चरित्र हे त्या जन्माचे कर्म मानले जाई. देव हा कोण्या एका जातीचा नव्हता. ते सर्वांचे असत नि सर्व त्याची पूजा करू शकायचे. पण जर देवासच त्याची पूजा एका विशिष्ट जातीद्वारे अपेक्षित असेल तर त्यालाही मोकळीक होती. ब्राह्मण मातंगी देवीची पूजा करायचा तो मातंगी पुरोहिताद्वारे. मातंगाला चांडाळ मानले जायचे. तरी फरक, भेद नाही केला जायचा. राहुला प्रसन्न करण्यासाठी भंग्याला दान देणे अनिवार्य होते तर सर्व जातींचे लोक दान देत असत. सर्व भारतात ग्रहणाच्या अनर्थाचे रक्षण हे भंग्यांना दान दिल्यानेच होत राहायचे. अशा प्रकारे भारतीय संस्कृतीने सर्व जातींना आपल्यात सामावून घेतले होते. पण तोवर धर्मविशेषाचे आगमन भारतात झाले नव्हते. धर्मागमन स्वीकारण्याची मानसिकता भारतीय समाजाची नव्हती.

 धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे संघटित धर्मतत्त्वे. अनेक लोक एकाच देवास मानतात, एकाच प्रकारचा आचार करतात, तेव्हा एखाद्या जातसमूहास आपल्यात सामील करून घेतात, तेव्हा सामील झालेले लोक स्वीकृत धर्माचे आचार पाळतात, स्वीकारतात. इथे धर्मसाधना व्यक्तिगत न राहता,

साहित्य आणि संस्कृती/१७६