पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/167

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधोरेखित करत विष्णू प्रभाकरांनी लिहून ठेवले आहे की "प्रचुरता और संपन्नता की संस्कृति कम तनाव पैदा नहीं करती। अधिक-से-अधिक प्राप्त करने की अंधी दौड में क्या नहीं करना पडता आदमी को और उसे पा लेने के बाद भी वह नहीं जानता कि क्या करे वह उसका। ऐश्वर्य और विलासिता की भी एक सीमा होती है। वहाँ भी तो ऊर्जा खर्च होती है और मानव शरीर में उसका सीमित भंडार होता है। हंस सेल्ये (विदेशी दार्शनिक) के अनुसार वासनापूर्ण चुंबन और कष्टदायक प्रहार दोनों बराबर का तनाव पैदा करते है।" हिप्पी संस्कृती केवळ भौतिकाचे वैषम्य व निराशा व्यक्त नाही करत. ती शारीरी तृष्णेचीपण प्रतिक्रिया आहे, हे विष्णू प्रभाकरांनी या लेखातून विस्ताराने समजावले आहे. सदरचे पुस्तक वर्तमान व्यवहाराचे तपमापक बनून आपल्याला अस्वस्थ करते.

 संस्कृतीचा दुसरा संबंध धर्म व्यवहाराशी असतो. विष्णू प्रभाकरांनी या लेखाच्या उत्तरार्धात संस्कृतीच्या अनेक व्याख्या देऊन तिचे स्वरूप समजाविले आहे. संस्कृती आणि संस्कार या समाज संबंधांची यात सविस्तर चर्चा आहे. खरं तर हे दोन लेख मूलतः विष्णू प्रभाकरांनी दिलेले भाषण असल्याने त्यास हितगुजाचे संवादी रूप येऊन गेले आहे. संवाद शैलीने हा लेख साहित्यिक व वाचक यामध्ये सेतूचे काम करतो. विष्णु प्रभाकरांनी अल्बर्ट आइनस्टाइनचं एक उद्धरण देत केलेला या निबंधाचा समारोप तुमच्यापर्यंत पोहचायलाच हवा म्हणून त्याचा कित्ता गिरवतो. "मानवजाति जिस दिन संस्कृति के महत्त्व को समझेगी उसी दिन वह अपनी आत्मा के साथ साक्षात्कार करने योग्य हो सकेगी। संस्कृति न तो भौगोलिक सीमा बंधनों को महत्त्व देती है और न राजनीति को ही। संस्कृति तो अखिल मानवता की सम्मिलित पूँजी है।" (संस्कृति का मूलाधार से उधृत)

 उत्तरार्ध-लेखात विष्णु प्रभाकरांनी संस्कृतीचा संबंध धर्म, विज्ञान, उत्पादन, शिक्षण, सौंदर्यविषयक धारणा इत्यादिशी विशद करून संस्कृतीची समग्रता आपल्यापुढे मांडली आहे. धर्माचे खरे कार्य माणूस समन्वयाचे राहिले आहे. सहिष्णुता तिचा खरा स्थायीभाव, पण व्यवहारात धर्म मात्र या विरुद्ध आचरला जातो तिथे नि तेव्हा धर्म व संस्कृतीत संघर्ष उभा ठाकतो, हे विष्णु प्रभाकरांनी नेमक्या शब्दात व्यक्त केलं आहे. धर्माप्रमाणे विज्ञानानेही संस्कृतीसमोर उभा दावा मांडल्यासारखी स्थिती आहे. विज्ञानाने तंत्रज्ञानाला जन्म दिला. तंत्रज्ञानाने माणसाचे भौतिक जीवन समृद्ध केलं. आज माणूस तंत्रज्ञानाच्या हातचं बाहुलं बनला आहे. संस्कृती यापासून वाचवण्याचा

साहित्य आणि संस्कृती/१६६