पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

युरोप आणि भारत : सांस्कृतिक चिकित्सेचे प्रश्नोपनिषद

पाश्र्वभूमी

 हिंदी साहित्याच्या विसाव्या शतकातील पूर्वार्धात साहित्य लेखन करून उत्तरार्धातील साहित्यावर आपल्या तत्त्वचिंतनाचा प्रभाव टाकणाच्या कथाकार जैनेंद्र कुमार यांना हिंदी जगतात ओळखले जाते ते गांधीवादी विचारक म्हणून ज्या काळात प्रेमचंद समाज चित्रण करत सामूहिक जीवनाची चिकित्सा करत होते, त्याच काळात जैनेंद्र कुमार यांनी आपल्या कथा-कादंब-यांतून व्यक्तिवादी राग आळवला. आपल्या कथात्मक साहित्यातून त्यांनी मनौवैज्ञानिक विश्लेषण करत चरित्र चित्रणाची एक नवी वाट रूढ केली. ऐन तारुण्यात महात्मा गांधींच्या हाकेला ओ देत त्यांनी शिक्षण सोडून तुरुंगात जाणे पसंत केले. आयुष्यभर गांधीवाद व सर्वोदयाचा काया, वाचा, मने पुरस्कार करणारे जैनेंद्र हिंदीच्या बुद्धिजीवी वर्तुळातले ज्येष्ठ मार्गदर्शक, जीवनकाळातील परिषदा, चर्चासत्रे यातील जैनेंद्रांची उपस्थिती सर्वांना वक्तृत्व व चिंतनाची पर्वणी असायची. मार्क्सवादी कथाकार यशपाल, अस्तित्ववादी अज्ञेय, नवकथाकार, कमलेश्वर साच्यांशी वैचारिक मतभेद व्यक्त करत त्यांनी स्वतःची वैचारिक बैठक स्पष्ट केली. कथा, कादंबरी, नाटक, निबंध, आठवणी, पत्रे, समीक्षा, तत्त्वज्ञान, राजकारण, बालसाहित्य असं बहुअंगी लेखन करणारे जैनेंद्रकुमार, साहित्य अकादमीचे फेलो, पुरस्कृत साहित्यिक तर होतेच, पण हिंदीतील सर्व श्रेष्ठ पुरस्कारांचे धनी ठरलेले. ते पंचाहत्तर साहित्यकृतींचे धनी होतेच. शिवाय अनेक डी. लिट्सनी सन्मानित. पण जैनेंद्र भारतीय ज्ञानपीठापासून वंचित कसे असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. पण त्याचे खरे कारण ते पुरस्कारकर्ते होते, हे होय. रशिया, स्वित्झर्लंड, चीन, श्रीलंका, जपान, अमेरिका पाहिलेले जैनेंद्रकुमार त्यांना युरोप आणि आशियातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व तत्त्वज्ञानविषयक

साहित्य आणि संस्कृती/१४६