पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महत्त्वाचे. कारण या महनीय व्यक्तींनी भारतीय जनमानस सुधारणावादी बनवला. म्हणून जनतेस आपल्या गुलामीची जाणीव होऊन सामाजिक मन्वंतर घडून आले. स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाद्वारे पंजाब व उत्तर प्रदेशात विशेषत्वाने धार्मिक शुद्धीकरण घडवून आणले. स्वामी विवेकानंदांनी भारतीय धर्म विश्व मंचावर स्पष्ट केला. रवींद्रनाथांनी तेच कार्य साहित्याच्या माध्यमातून केले व नोबेल पारितोषिक मिळविले. सैयद अहमद खान यांनी अलिगढ ओरिएंटल कॉलेजची स्थापना करून मुस्लीम मध्य वर्ग शिक्षित करण्याकडे लक्ष पुरविले. स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे रूपांतर अलीगढ मुस्लीम विद्यापीठात होणे यात त्यांची दूरदर्शिता सिद्ध होते. मौलाना अब्दुलकलाम आझाद यांच्या नेतृत्वाखाली (अध्यक्षपद) भारत छोडो आंदोलन यशस्वी झाले हा इतिहास फार थोड्या लोकांना माहीत असावा. ते अनेकदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्या वेळी हा मान राष्ट्रपति पदासारखा असायचा. त्यांनी मुस्लीम युवकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य केले. महाकवी महंमद इकबाल ‘सारे जहाँ से अच्छा'मुळेच माहीत. पण त्यांचा ‘इसरारे खुदी' हा काव्य ग्रंथ वाचाल तर लक्षात येईल की तो हिंदू-मुस्लीम ऐक्य भावनेवर रचला गेला आहे. लोकमान्य टिळकांनी जहाल भाषा वापरून भारत जागा करण्याचे (व इंग्रजांची झोप उडवण्याचेही!) कार्य एकाच वेळी केले. या सर्व महान व्यक्तींच्या विचार व कार्यातून भारतात ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक साहित्यिक सद्भावाचे मन्वंतर घडून आले.

 गजानन माधव मुक्तिबोधांचं हे ‘भारत: इतिहास और संस्कृति' पुस्तक वाचत असताना मागे केव्हातरी मुक्तिबोधांनी लिहिलेल्या स्व साहित्यविषयक टिपणात लिहिलेले एक वाक्य सतत पाठलाग करत होते. त्यात त्यांनी म्हटले eld. (A Piece of literature should sound true and genuine before it appears 'beautiful or 'artistic') मुक्तिबोधांसारख्या तत्त्वनिष्ठ परंतु संवेदनशील माणूस स्वत:च्या देशाच्या इतिहास आणि संस्कृतीचे आकलन मांडत असताना आणि तेही शिकणाच्या नव्या पिढीसाठी आणि पिढीपुढे मांडत असताना आपली साहित्य कृती कशी असावी याबद्दलची अनेक पर्याय त्यांच्यापुढे होते. ती सत्यनिष्ठ, अस्सल, ललित, मनोहारी, कलात्मक कशी असली पाहिजे? इतिहास आणि संस्कृतीबद्दल लिहिणं प्रत्येक काळात जोखमीचे कार्य असते खरे. म्हणून फार कमी लेखक या वाटेला जातात. मुक्तिबोधांनी हे पुस्तक लिहिताना 'True' आणि 'Genuine' या दोन शब्दांची

साहित्य आणि संस्कृती/९९