पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अॅरिस्टॉटलने ‘जोपर्यंत एखाद्या गोष्टीची मला प्रचिती येणार नाही, तोपर्यंत मी ती स्वीकारणार नाही', असे म्हटले होते गॅलिलिओची सर्वात मोठी क्रांती म्हणजे त्याने जगाची गती बदलली. गॅलिलिओने सगळ्या सृष्टीचे केंद्र पृथ्वी नसून सूर्य आहे हे सांगितले. संपूर्ण सृष्टीत होणारे परिवर्तन हे सूर्याशी निगडित आहे; पण त्या वेळच्या धर्मतत्त्वारनुसार सृष्टीतील बदलाचे केंद्र पृथ्वी होते. गॅलिलिओ धर्माच्या विरुद्ध बोलत होता. गॅलिलिओच्या काळात धर्म उदार झाला होता. त्या वेळच्या धर्मसत्तेने गॅलिलिओने धर्मसत्तेच्या विरोधात भाष्य केल्यामुळे त्याला आजन्म कारावासाची शिक्षा दिली तसेच सर्वांत मोठी शिक्षा म्हणून धर्माच्या प्रार्थना गुडघे टेकून म्हणायला लावल्या. ‘जो वर्तमानाचे सत्य सांगत होता त्याला अशा प्रकारची शिक्षा देण्यात आली. गॅलिलिओने सॉक्रेटिसचा मृत्यू, अॅरिस्टॉटलची उपेक्षा पाहिली होती. मधल्या काळात गॅलिलिओच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांनी गॅलिलिओचा एवढा प्रचार केला की, त्याचे म्हणणे केवळ ग्रीसमध्ये न थांबता युरोपमध्ये पसरले व युरोपमध्ये प्रबोधन पर्व सुरू झाले. त्या प्रबोधन पर्वाचे नाव 'विज्ञान' होय. युरोपमध्ये चर्चेस आहेत, आशियात मंदिरे आहेत. या दोन्हींमध्ये फरक कोणता असेल तर तो म्हणजे युरोपमधील चर्चेस ओस पडत आहेत, निर्मनुष्य होत आहेत; या उलट आशियातील मंदिरे ओस पडली नाहीत. उलट आशिया खंडामध्ये जसजशी समृद्धी आली तशी मंदिरांची परिस्थिती बदलली. आपण भौतिकदृष्ट्या समृद्ध झालो, पण बौद्धिकदृष्ट्या समृद्ध झालो नाही. वर्तमान समाज जर बौद्धिकदृष्ट्या समृद्ध झाला असता. तर तो युरोपसारखा अंधश्रद्धामुक्त झाला असता. आपण कितीही शिकलो तरी अंधश्रद्धामुक्त। होऊ शकत नाही, याचे कारण म्हणजे आपण उपजीविकेसाठी शिकलो. आपण ज्ञानाशी वाद घालण्यास शिकलो नाही. तुम्ही जे ज्ञान संपादन केले आहे, ते खरे आहे की नाही हे पडताळण्यासाठी एकदा कसोटी घेतली पाहिजे.

 विनोबांचा ‘मधुकर' नावाचा एक निबंधसंग्रह आहे. त्यामध्ये त्यांनी ‘कृष्णभक्ती' नावाचा एक निबंध लिहिला आहे. माणसाचे प्रेम चांगल्या गोष्टीवर असते की वाईट गोष्टीवर' हा या निबंधाचा मुख्य विषय आहे. त्यामध्ये विनोबांनी भारतीय समाजाचा अभ्यास करून भारतीय समाज हा ‘कृष्णभक्त समाज आहे, असे विधान केले आहे. आपल्या सगळ्या अंधश्रद्धा ह्या कृष्णकृत्य आहेत. वाईटचीसुद्धा एक नशा असते; म्हणूनच माणसाला वाईटच जास्त आवडते. विनोबांच्या म्हणण्यानुसार माणसं

सामाजिक विकासवेध/८५