पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्या सुमारे पाच हजार शेतकरी आत्महत्या झाल्या, त्यांत महाराष्ट्र अव्वल होता, हे लक्षात घेतले की या समस्येवर महाराष्ट्राने अधिक नि अतिरिक्त जागरूकता, कृतिशीलता (Pro-Activeness) दाखविली पाहिजे याची खूणगाठ पटते. देशातील सन २०१४ ची शेतकरी आत्महत्याप्रवण राज्यांची संख्यावारी पुढीलप्रमाणे होती - १) महाराष्ट्र (२५६८), २) तेलंगणा (८९८), ३) मध्यप्रदेश (८२६), ४) छत्तीसगढ (४४३), ५) कर्नाटक (३२१). भौगोलिक दृष्ट्या पाहिले तर ही सर्व राज्ये उष्ण कटिबंधातील असल्याचे दिसून येते. या प्रांतात ज्या शेतक-यांनी आत्महत्या केल्या, त्यांचा वयोगट पाहिला की, असे लक्षात येते की या आत्महत्यांपैकी ३७१२ आत्महत्या या ३० ते ६0 या प्रौढ वयोगटातील असून त्या एकूण आत्महत्येच्या हे प्रमाण ६६ टक्के भरते. १८ ते ३0 या युवा वयोगटात मात्र १३00 इतक्याच आत्महत्या झाल्या. ते प्रमाण २३ टक्के दिसून येते. त्यामुळे पुढील आत्महत्या टाळायच्या तर युवा शेतक-यांचे मनोबल वाढविणे व प्रौढ शेतक-यांचे प्रबोधन करणे असा दुहेरी कार्यक्रम राबविल्याशिवाय आपणास शेतकरी आत्महत्या नियंत्रित करता येणार नाहीत.

  गतवर्षीची (२०१५) शेतकरी आत्महत्या आकडेवारी पाहिली असता ती पूर्ववर्षापेक्षा कमी असली तरी दुर्लक्षिण्यासारखी खचीतच नाही. गतवर्षी महाराष्ट्रात एकूण ३२२८ शेतकरी आत्महत्या झाल्याचे दिसते. त्यात विभागवार वर्गीकरण केले असता लक्षात येते की, हे प्रमाण विदर्भात अधिक आहे. विदर्भात १५४१ तर मराठवाड्यात ११३० शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकरी आत्महत्येच्या कारणांचा जो अभ्यास झाला, त्यात असे दिसते की, कारणवैविध्य असले तरी प्रामुख्याने ती कारणे आर्थिक नि सामाजिक आहेत. सन २०१४ च्या शेतकरी आत्महत्यांच्या अभ्यासात खालील कारणनिहाय संख्या हाती येते १) कर्जबाजारीपणा (११६३) २) कौटुंबिक कारणे (११३५) ३) शेतीसंबंधी कारणे (९६९) ४) शेती व्यवसायातील अपयश (७४५) ५) नैसर्गिक आपत्ती (दुष्काळ इ.) (२५0). अधिक शेतकरी आत्महत्या त्या कर्जबाजारीपणामुळे झाल्या असल्यामुळे भविष्यकाळात शेतक-याचा सातबारा कोरा कसा राहील, हे पाहणे गरजेचे दिसते. एक कर्ज भागविण्यासाठी दुसरे कर्ज घेण्याची निर्माण होणारी अनिवार्यता, सहकारी पतसंस्था, बँका, कारखाने यांनी दिलेल्या हप्तेबंदीचे दुष्टचक्र व शासनाच्या निरंतर कर्जमाफीच्या घोषणा या सर्वांचा परिपाक शेतक-यांची निष्क्रियता, परावलंबन वाढविते आहे. दैनिक खर्चात बचत, शेतविकास व पीकखर्चात कपात, उत्पादनाला हमीभाव, बागायती व

सामाजिक विकासवेध/१२९