‘परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी
मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ।।
भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे
गुलाम भाषिक होऊनि आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका।।'
१९९६ मध्ये ज्ञानपीठकार कविश्रेठ कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्यदेवीची विनवणी' ही कविता लिहिली, त्यातले हे दोन चरण दोन दशकांनंतरही यथार्थ वास्तव बाटावेत, ही मराठी भाषिक समाज म्हणून तुमची-आमची व त्याहून जास्त महाराष्ट्र शासनाची शोकांतिका आहे.
याचे कारण महाराष्ट्र शासनाचे दोन ताजे निर्णय. एक म्हणजे पटसंख्या कमी म्हणून सुमारे १३०९ शाळा चालू वर्षात बंद करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय व दुसरे कारण म्हणजे महाराष्ट्र सेल्फ फायनान्स स्कूल्स अॅक्ट २०१२ मध्ये बदल करून खासगी कंपन्यांना शाळा उघडण्याचा घेतलेला निर्णय, याचे दोन गंभीर परिणाम होतील. एक म्हणजे खासगी विनाअनुदानित इंग्रजी शाळांच्या संख्येत वाढ होण व दुसरं म्हणजे मराठी शाळा ओस पडणं! एकूण चार हजारांच्यावर शाळा - ज्याची पटसंख्या दहापेक्षा कमी आहे, ती टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या निर्णयामुळे मराठी भाषेत शिकणा-या हजारो मुलांना, खास करून मुलींना शिक्षणाची दारे कायमचा बंद होण्याची दाट शक्यता आहे. कारण दर अंतरावर मुलींना शाळेत पाठवायला पालक उत्सुक नसतात, त्यामुळे ज्यांच्या शाळा या निर्णयानं बंद होतील त्यांचे बालवयातच लग्न लावून देण्याचे प्रमाण वाढणार आहे.
खासगी कंपन्या या प्रामुख्याने इंग्रजी शाळाच उघडतील कारण ते हे क्षणाचे काम व्यवसाय म्हणून पाहतील व नफा कमवतील. त्यामुळे शालेय शिक्षण ज माफत व सक्तीचे दिले पाहिजे. ते महागडे होईल आणि पालकांवर आर्थिक ताण पडल. भारतीय संविधानाने दिलेला शिक्षणाचा मूलभूत हक्क हा लाखो मुलांना बद पडणाच्या मराठी शाळा व उघडल्या जाणा-या वाढत्या इंग्रजी शाळा यामुळे भविष्यात नाकारला जाणार आहे.
या गंभीर सामाजिक समस्येची दखल मराठी सारस्वतांनी घेतलीच पाहिजे. कारण भाषिक प्रांतरचनेच्या तत्त्वाप्रमाणे मराठी भाषिक राज्य म्हणून आपले महाराष्ट्र राज्य स्थापन झाले आहे, पण इथे कुसुमाग्रजांचे 'माय मराठी मरते इकडे' हे बोल खरे ठरिवण्याचा आपण जणू चंग बांधला आहे व खुशी खुशी ‘परकीचे पाय चेपण्याची