Jump to content

पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १८. ३३॥ करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः ॥ १८ ॥ होय, असे म्हटले आहे. मनुष्याचा प्रयत्न सफल होण्यास इतक्या सर्व गोष्टींची आवश्यकता असून त्यांपैकी पुष्कळ आपल्या ताब्यांतल्या अगर आपणांस माहीतहि जर नसतात, तर मी अमुक करीन म्हणून अभिमान धरण, किंवा माझ्या कर्माचे फल अमुच हावे अशी फलाशा ठेवणे, हे मूर्खपणाचे लक्षण होय, असें उघड सिद्ध होते (गीतार. पृ. ३२४ व

३२५ पहा). तथापिपाची फलाशा सुटली त्याने वाटेल ते कुकर्म करावें

असाहि सतराव्या श्लोकाचा अर्थ समजावयाचा नाही. सामान्य मनुष्य जे काही करितात ते स्वार्थाच्या लोभाने करीत असल्यामुळे त्यांच्या हातून गैरवतन होत असते. पण ज्याचा स्वार्थ, लोस किंवा फलाशा पूर्ण लयास जाऊन सर्व भूतें ज्याला सारखीच झाली त्याच्या हातून कोणाचेंच अनहित होणे शक्य नाही. कारण दोष बुद्धत असतो, कमीत नाही. म्हणून ज्याची बुद्धि शुद्ध व पवित्र असें प्रथम कायम ठरलं त्याने केलेली एखादी गोष्ट लौकिकदृष्ट्या दिसण्यांत परी विपरीत दिसली तरी त्यांतील बीज शुलूच असले पाहिजे असें न्याय तःच प्राप्त होते, व । स्याबद्दल शुद्ध बुद्धीच्या मनुष्यास जबाबदार धरितां येत नाही, असे सतराव्या श्लोकांत म्हटले आहे. स्थितप्रज्ञाच्या म्हणजे शुद्ध बुद्धीच्या पुरुषाच्या निपरापत्वाबद्दल हे तत्त्व उपनिषदांतूनहि वाणलेले आहे (कौषी. ३. १ व पंचदशी, १४.१६ व १७ पहा). पण यासंबंधाने गीतारहस्याच्या बाराव्या प्रकरणांत (पृ. ३६८-३७२ पूर्ण विवेचन केले असल्यामुळे येथे जास्त विस्तार करीत नाही. अर्जुनाच्या प्रश्ना वरून उपस्थित झालेल्या संन्यास व त्याग या शब्दांच्या अर्थाची याप्रमाण मीमांसा कृरून स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेली कमें अहंकार- बुद्धि व फलाशा सोडून करणे हाच सात्त्विक किंवा खरा त्याग होय. कम सोडणे हा खरा त्याग नव्हे, असे सिद्ध केल्यावर, कर्माच्या सात्वि- कादि भेदांचा जो विचार सतराव्या अध्यायांत सुरू केला तोच आतां कर्मयोगष्टया पुरा करून घेतात. (१८) ज्ञान, ज्ञेय, व ज्ञाता अशी तीन प्रकारची कर्मचोदना. आणि