पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फायेदा केला आहे आणि आमकि एक बाकि गैर उसकि मफलिस कुलास माफ केली, येसे समजावणे. साहेब ते माफद्दची सनद देतील जे बाकि नफर निसबत आसली ते हिसेबीच उसूल घेत जाणे बाकिदार माहाल न करणे . ये रवेसीने तुजला पदनसी येत तपसिले करून हा रोखा लिहून दिधला आसे. आकलेने व तजवजीने समजोन याप्रमाणे कारबार करीत जाणे की, तुझा कामगारपणाचा मजरा होये आणि साहेब तुजवरी मेहेरबान होत ते करणे..."

 या पत्रात शिवाजीराजाची शेतीबद्दलची दृष्टी फार स्पष्ट आणि स्वच्छपणे मांडलेली आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या सबंध इतिहासात शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेला शिवाजी राजा याच्याशिवाय दुसरा कोणताही राजा नव्हता. यासाठी वेगळा पुरावा देण्याची काही वेगळी आवश्यकता रहात नाही. रामाजी अनंत यांना पत्र लिहिताना राजाने काही गोष्टी अत्यंत स्वच्छपणे सांगितलेल्या आहेत. शेतीचे व्यवहार कसे असावेत? नियोजन कसे असावे? महत्त्वाचे काम काय? हे सांगताना राजा काय म्हणतो, "सरकारी अधिकाऱ्यांनी स्वत: जातीने गावोगाव दौरे करून तेथील कुणबी (शेतकरी) गोळा करावेत. त्यांच्या अडचणी स्वतः समजावून घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या कुवतीनुसार त्याला जमीन द्यावी. त्याची कुवत असेल तर त्यास बैल, नांगर आणि उदरनिर्वाहासाठी ज्याच्याकडे धान्य नाही अशांना रोख पैसे द्यावेत. बैल घेऊन द्यावेत. खंडी दोन खंडी धान्य उदरनिर्वाहासाठी द्या व शेतकऱ्यांच्या कुवतीनुसार त्याला शेती द्यावी.

 "अशा शेतकऱ्याला दिलेल्या कर्जाचे व्याज न आकारता फक्त मुद्दल हळूहळू त्याच्या कुवतीनुसार व परिस्थितीनुसार वसूल करून घ्यावे. यासाठी स्वराज्याच्या खजिन्यातून लाख दोन लाख लारीपर्यंत परस्पर खर्च करण्याची परवानगी सुभेदाराला मुक्तपणे देण्यात आली होती. एखादा शेतकरी शेती करण्याची उमेद बाळगून असेल पण त्याच्या दुर्दैवाने दुष्काळी परिस्थितीमुळे अस्मानी संकटामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे (सुलतानी संकटामुळे) जर तो कर्ज फेडू शकला नाही व त्याची अडचण खरी असल्याचे अधिकाऱ्याने राजाना पटवून दिले तर अशा शेतकऱ्याला मागील कर्जाची माफी दिली जाईल.

 ३५० वर्षांपूर्वी शिवाजी राजाला शेतकऱ्यांबद्दल जी स्वच्छ व स्पष्ट दृष्टी प्राप्त झाली होती त्याचा लवलेश तरी आज क्षणोक्षणी शिवाजी राजाचे नाव घेणाऱ्या राज्यकर्त्याच्या वर्तणुकीत त येतो काय हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.

 महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात शेतकऱ्यांची सर्वतोपरी काळजी घेणारा असा दुसरा दस्तऐवज सापडणे केवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे. शेतकऱ्याच्या

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ७१