पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिर्झा राजाच्या सैन्याने जुन्नर, जुन्नरखालचे कोकण या भागात धुमाकूळ घालणे, राजगड म्हणजे राजाच्या राजधानीच्या परिसरातील ५० खेडी आणि त्यांची शेती-भाती उद्ध्वस्त करणे, शिवापूर सिंहगड परिसरातील खेड्यात जाळपोळ लुटलूट, कोरीगडाच्या लोहगडाच्या आसपासची लागवड जाळून टाकणे, गुरेढोरे पळविणे असे अनेक पराक्रम केले. १६६५ च्या एप्रिल-मे या दोन महिन्यात स्वराज्याची रयत नागवण्याचे हे उपद्व्याप चालू होते. पुरंदर किल्ल्याला वेढा चालू होता.

 केवळ दीड कील्ला मोगलांनी घेतलेला होता. लष्करीदृष्ट्या जास्त नुकसान झालेले नव्हते. लोक लढायला तयार होते, पण नागवल्या जाणाऱ्या प्रजेसाठी राजाने जून महिन्यात तह केला स्वत: शरण आले, पण रयतेची छळवणूक थांबवली. जून महिन्यात हा पुरंदरचा तह झाला. त्यामुळे दोन महिने नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना परत पावसाळ्यात शेतीची लागवड करता आली असावी. गावखेडी वसवता आली असावीत. कोणताही शक्तद्दचा मुद्दा उपस्थित न करता अजून खूप कील्ले स्वत:च्या ताब्यात असतानाही आपल्यासाठी हाल सोसून उभे राहणाऱ्या शेतकऱ्यांची, त्यांच्या मुला माणसांची, गावच्या कारुनारुची वाताहत होते हे पाहून राजाने अवघ्या तीन महिन्यात शरणागती पत्करली. प्रजा तीन वर्षांचे हाल सहन करू शकते हे तिने आधीच्या शाहिस्तेखानाच्या आक्रमणात दाखवून दिले होते. पण राजाला प्रजेच्या या वाताहतीची कल्पना सहन होईना, त्याने शरणगती पत्करली.

 स्वराज्यात घुसून धुमाकूळ घालण्यात यश मिळाले ते मिर्झा राजे जससिंग यालाच. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाची फौज स्वराज्याच्या हदयात तळ ठोकून बसली होती. या स्वराज्याची पूर्ण सफाई करूनच परत जायचे असा संकल्प सोडून मिर्झाराजे आणि त्यांच्या मदतीला शिवाजीराजाबद्दल अत्यंत द्वेष असलेला दिलेरखान हे दोन्ही सरदार आले होते. मिर्झाराजे जयसिंगाने याच काळात सैन्यसत्तेचे सर्व अधिकार औरंगजेबाकडून आपणास मिळविले होते. औरंगजेबाने हे अधिकार देताना अतिशय महत्त्वपूर्ण वाक्य वापरले, "तुमच्या मुत्सद्देगिरीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. शिवाजीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी तुम्हाला जे जे योग्य वाटेल ते ते सर्व करा."<

 ३१ मार्च १६६५ रोजी दिलेरखानने पुरंदर चहू बाजूंनी वेढला. मिर्झाराजे जयसिंग हे अतिशय हुशार सेनापती होते. पुरंदरची एकंदर भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पुरंदरच्या समोर असलेला वज्रगड ताब्यात घेतल्याशिवाय पुरंदरवर तोफा डागता येणार नाहीत हे मिर्झाराजा जससिंग याने बरोबर ताडले. जयसिंग १ एप्रिल रोजी पुरंदरच्या पायथ्याशी आला आणि तेथेच तळ ठोकून बसला. १२ एप्रिल

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ६६