पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "...अस्मानी किताब म्हणजे कुराण. ते ईश्वराची वाणी आहे. त्यात आज्ञा केली ती ईश्वर जगाचा व मुसलमानाचा आहे. वाईट अथवा चांगले दोन्ही ईश्वरचे निर्मित आहे. कोठे महेजतीत यवन लोक बांग देतात, कोठे देवालय आहे तेथे घंटा वाजवतात. त्यास कोणाचे धर्मास विरोध करणे हे आपले धर्मापासून सुटणे व ईश्वराचे लिहिले रद्द करून त्याजवर दोष ठेवणे आहे... न्यायाचे मार्गाने पाहता जजिया पट्टीचा कायदा केवळ गैर...ज्यावर जुलूम झाला त्याने हाय हाय म्हणून मुखाने धूर काढल्यास (तळतळाट केल्यास) त्या धुराने जितके लवकर जळेल तितके जलद अग्नीही जाळणार नाही...याजवर हिंदू लोकास पीडा करावयाचे मनात आले तर आधी राजा जयसिंगाकडून जजिया घ्यावा...गरीब अनाथ मुंग्या चिलटासारखे आहे त्यास उपसर्ग करण्यात मोठेपणा नाही..."

 शिवाजीने कर लावताना धर्माच्या नावावर कोणताही भेद केलेला नाही. तुलनेत इस्लामी राज्यातील बूत फरोशी जकात हे कर होते. हिंदु मूर्तिपूजक आहेत म्हणून त्यांना बूत फरोशीचा कर भरावा लागे, तर मुसलमानांना २.५% व हिंदूना ५% जकात इस्लामी राज्यामध्ये होती. अशा पद्धतीची स्वतंत्र करव्यवस्था स्वराज्यात नव्हती.

 राजा स्वत: तर मौनीबाबा पाटगावकर, केळशीचे बाबा याकूब या मुसलमान संतांच्या दर्शनासाठी गेल्याचा उल्लेखही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहे. राजाचे आजोबा मालोजी भोसले हे शंभू भवानीचे नि:स्सीम भक्त होते. कठोर व्रते ते करीत. पूजाअर्चा केल्याशिवाय मुखात अन्नाचा कण वा पाण्याचा थेंब घालीत नसत. श्रीगोंद्याच्या शेख महंमदवर त्यांची निष्ठा होती. त्यांनी शेख महंमदाचा गुरुपदेश घेतला होता. शहाजी राजांच्या जन्माबद्दलही नवसाला पावला अशी श्रद्धा असल्यामुळे मालोजीराजांनी एका मुलांचे नाव शहाजी व दुसऱ्याचे नाव शरीफजी असे ठेवले होते.

 स्वराज्यामध्ये सर्व धर्मीयांना अभय असल्यामुळे व सैन्यात पराक्रम गाजवल्यानंतर सन्मान करण्यात शिवाजी कधीही मागेपुढे पाहात नसल्यामुळे सैन्यात भरती होणाऱ्यामध्ये मुस्लिमही बहुसंख्येने हिंदवी स्वराज्याच्या फौजेमध्ये होते. काही अगदी उच्चपदस्थ होते. त्यांच्या नामोल्लेख करता येईल. नूरखान बेग हा पायदळाचा पहिला सरनौबत इब्राहीमखान व दौलतखान कारभारी अधिकारी. काझी हैदर हा वकिल, तर मदारी मेहतर हा शिवाजीच्या अतिशय अंतस्थ गोटातील विश्वासू सहकारी होता. विजापूरला बड्या बेगमेने ज्यावेळेला बेहलूखान वगैरे पठाणी सरदारांना ठार केले त्यावेळी आदिलहाकडील ७०० पठाण राजाकडे नोकरी

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ५१