पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 गावागाडा विरुद्ध लुटारू


 गावगाड्याची मुक्तता

 सुलतान, त्यांचे सरदार, मनसबदार आणि देशमुख एकमेकांशी शेतकऱ्यांना लुटण्याच्या हक्काकरिता लढाया करीत होते. त्याचवेळी गावगाड्यातील बांधणी परंपरागत रीतीने चालून राहिली. गावगाड्याची रचना चार टप्प्यांची होती. राजातर्फे सत्ता बजावणारी, कारभार चालवणारी, हवालदार, कारकून इत्यादी राज्याधिकारी मंडळी यांचा गावातील अंर्तगत कारभारावर फारसा ताबा नसे. ती सत्ता ग्रामाधिकाऱ्यांकडे किंवा चाकरी वतनदारांकडे असे. गावचा पाटील आणि कुलकर्णी हे सारा वसूल करणे, त्याच्या हिशोब ठेवणे, भरणा करणे, न्यायनिवाडा करणे ही कामे बघत व त्याबद्दल त्यांना 'हकलाजिमा' मिळत असे. वतनदारानंतरचा गावातील प्रमुख वर्ग म्हणजे वंशपरंपरेने जमिनीची मालकि उपभोगणाऱ्या शेतकऱ्यांचा कींवा मिरासदारांचा. ज्यांना गावात जमीन नसे त्यांना कसल्याही प्रकारचे सामाजिक अथवा पंचायतीचे हक्क नसत. त्यांना 'उपरे' म्हणत. शेतावर अथवा गावात मोलमजुरी करून अथवा मुदतीने जमीन कसण्यास घेऊन ते उपजीविका करत.उत्पादनातील शेवटचा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे सुतार, लोहार, चांभार, महार, मांग, कुंभार, न्हावी, धोबी, गुरव, जोशी, भट, मुलाणी इत्यादी बलुतेदार. बलुतेदारांना मिरासदारांकडून सुगीच्या काळात तयार झालेल्या धान्याचा काही भाग बलुतं म्हणून दिला जात असे. त्यांना पंचायतीच्या कामकाजात पूर्ण हक्काने भाग घेता येई. थोडक्यात, वतनदार, मिरासदार, बलुतेदार आणि उपरे ही गावगाड्याची प्रमुख चाके होती. याखेरीज धर्मसत्ता, ज्ञातिसत्ता आणि व्यापारी सत्ता स्वतंत्रपणे अस्तित्वात होत्या.

 गावागाड्यातील या वेगवेगळ्या घटकांनी प्रत्यक्ष उत्पादन करावे वा उत्पादनास हातभार लावावा आणि जागोजागी हत्यारी माणसे पदरी बाळगणाऱ्यांनी त्यांच्या मेहनतीचे फळ लुटून न्यावे हे हजारो वर्षे चालले. मुसलमान आल्याने लुटारूंच्या थरात आणखी एक भर पडली. मोकासदार-बलुतेदार उत्पादन करणार, गावापुरते

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ३९