पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 शिवपूर्व काळ


 १३१८ साली देवगिरीचा पाडाव पूर्ण झाला. शिवाजीचा जन्म १६३० सालचा आणि त्याने रोवलेली स्वराज्याची मुहूर्तमेढ १६५४ सालची. असे धरले तर या दोन घटनांमध्ये सव्वातीनशे वर्षाच्या वर काळ लोटला. या प्रदीर्घ काळात महाराष्ट्राचे सर्व रंगरूपच आमूलाग्र बदलून गेले.हे बदल समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण त्याशिवाय शिवाजीने घडवून आणलेल्या क्रांतीची सर्वंकषता कळणे कठीण होईल.

 परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय करून टाकली त्यामुळे आता पृथ्वीवर संरक्षणाची जबाबदारी उचलणारा, राज्यभार सांभाळणारा कोणी शिल्लकच उरला नाही अशी मान्यता मुसलमानी आक्रमणाच्या आधी कित्येक वर्षांपासून होती. अकबराच्या काळात कृष्ण भट्ट शेष याने 'शूद्राचार शिरोमणी' नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि हिंदूधर्मात आता राजतेजाचे वा राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाहीत, उरले ते फक्त ब्राह्मण व शूद्रच असे प्रतिपादन केले.

 महाराष्ट्रात देवगिरीच्या पाडावानंतर भूमी खरोखरच निःक्षत्रिय झाल्यासारखी दिसू लागली.राजवंशांचा व लष्करी पेशातील समाजाचा समग्र उच्छेद मुसलमानांनी मांडल्यामुळे तो समाज लुप्तच झाला. आसपासच्या उपजीविकेसाठी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांत मिसळून जाण्याखेरीज जिवंत राहण्याचीसुद्धा त्यांना काही शक्यता राहिली नाही. आपली हत्यारेपात्यारे गाडून टाकून ही मंडळी हाती नांगर घेऊ लागली. यामुळे शिलाहारांचे शेलार, परमारांचे पवार, कदंबांचे कदम आणि यादवांचे जाधव बनले. दरबारात मान असलेले मनसबदार दरकदार यांची वाताहत झाली. उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी ही म्हण या आपत्कालात तरी प्रत्यक्षात आली.

 राजदरबारात सर्व महत्त्वाची स्थाने मुसलमानांकडे गेली. धर्मांतर केलेल्यांना दरबारात हलकिसलकि अपमानास्पद कामेच मिळाली. संस्कृत व मराठी भाषांचा उपयोगसंपला.फारशी वाचूशकणारे पारसनीस महत्त्वाचे ठरले. दररोतच्या बोलण्यातही हजारोंनी फारसी शब्द मराठीत घुसले. लोकांचा वेशभूषेचा, राहणीचा ढंगच मुसलमानी होऊन गेला. हिंदू देवदेवतांपेक्षा मुसलमानी पीर आणि फकिर जास्त सामर्थ्यवान

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / २२