निरर्थक आहे; पण हिंदू संस्कृतीला असे बदनाम करण्याचा प्रयत्न हिंदूत्वाचे पोवाडे गाणारेच करीत आहेत. हिंदू धर्म हा शब्द आता जिभेवर रुळू लागला आहे, पार लोकांच्या बोलण्यात रूढ झाला आहे. हिंदू धर्माला याहीपलीकडे खाली खेचण्याकरिता त्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढविण्याचा भरकस प्रयत्न होतो आहे. यासाठी समर्थन म्हणून इतर धार्मिकांच्या चालचलणुकीकडे बोट दाखवले जाते. मुसलमान असे करतात मग आम्ही असे का करायचे नाही? ही भाषाच मुळी हिंदू परंपरेला शोभणारी नाही. पाकिस्तानमध्ये भारतातील खेळाडूंवर दगडफेक झाली म्हणून भारतातील प्रेखाकांनी अशीच दगडफेक कराची म्हटले तर दोघेही हास्यास्पद होतील. कुत्रा माणसाला चावला तर प्रत्युत्तर म्हणून माणूस कुत्र्याला थोडाच चावतो? हिंदू संस्कृतीचा खरा वारसदार कसा वागतो याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी २ ऑक्टोबर १९८९ च्या दिल्लीतील किसान जवान पंचायतीच्या वेळी दाखवून दिले.
हिंदूत्वाची पताका घेऊन त्याचा जयजयकार करणारे, त्याचा व्यापार करणारे, राजकारण करणारे हिंदूत्वाच्या अथांग प्रवाहाला बंदिस्त करू पाहत आहेत. 'हिंदू' हाही जर निव्वळ धर्म झाला तर प्रयोगशील सत्यशोधकांना आश्रय घ्यायला काही थाराच उरणार नाही.
३० डिसेंबर १९८९