पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/17

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुकुंदराज, ज्ञानोबांनी भागवत बखरीतील काही कल्पित भाग उचलून त्याचे प्राकृत भाषेत विवेकसिंधू व ज्ञानेश्वरी या नावांचे डावपेची ग्रंथ करून शेतकऱ्यांची मने इतकि भ्रमिष्ट केली की, ते कुरणासहित महंमदी लोकास नीच मानून त्यांच्या उलटा द्वेष करू कागले. नंतर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम या नावाचा साधू शेतकऱ्यामध्ये निर्माण झाला. तो शेतकऱ्यांतील शिवाजीराजास बोध करून त्याचे हातून भटब्राह्मणांच्या कृत्रिम धर्माची उचलबांगाडी करून शेतकऱ्यांस त्यांच्या पाशातून सोडवील, या भयास्तव भटब्राह्मणांतील अत्यंत वेदांती रामदास स्वामींनी महाधूर्त गागाभटाचे संगन्मताने, अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्टल ठरवून, अज्ञानी शिवाजीचा व नि:स्पृह तुकारम बुवांचा पुरता स्नेह वाढून दिला नाही.'

 महात्मा जोतिबा फुल्यांच्या इतिहासमांडणीला संशोधनाचा वा कागदोपत्री साधनांचा आधार नव्हता. अशा तऱ्हेचा पुरावा पाच हजार वर्षांचा इतिहास लिहिणाऱ्याला मिळवणं शक्यही नव्हतं. शूद्रांच्या गुलामगिरीच्या सूत्रावर त्यांनी प्रचंड प्रतिभेनं एक इतिहासाचा प्रपंच उभा केला. पण विद्वत्मान्य इतिहासकारांत आज जोतिबांना काहीच मान्यता नाही. (शरद जोशी- रामदेवरायाचा धडा.प्रचलित अर्थव्यवस्थेवर प्रकाश)

 शेतीमध्ये वरकड उत्पन्न तयार होऊ लागल्यापासून एका वेगळ्या कालखंडाला सुरूवात झाली. शेतीवर कष्ट करणाऱ्यांनी राबराबून अन्नधान्य तयार करावे आणि ते अशा अन्नधान्य लूटमार करणाऱ्या दरोडेखोरांनी लुटून न्यावे अशा व्यवस्थेचा हा नवीन कालखंड होता. लुटणाऱ्यांची संख्या वाढत गेली. तसे या लुटारूंचे रूपांतर सरकार राजामहाराजांत झाले. राज्यव्यवस्थेची सुरूवात हीच लुटीतून झाली. प्रत्येक लुटारू टोळीच्या प्रमुखाने स्वत:ची हत्यारबंद लुटीची फौज तयार केली. त्या फौजेच्या उदरभरणाकरिता आणि टोळीप्रमुखांच्या चैनीकरिता आसपासच्या शेतीतून तयार होणारे अन्नधान्य ताब्यात घेणे हे एकमेव साधन होते. काही काळानंतर या लुटीला व्यवस्थित स्वरूप देऊन महसुलाची यंत्रणा तयार झाली. प्रत्येक लुटारू-प्रमुख काही प्रदेशातील शेतकऱ्यांकडून त्यांच्या उत्पादनातील वाटा मिळविणे आपला स्वयंसिद्ध हक्क मानू लागले. मग आपापल्या राज्याच्या प्रदेशातील शेतकऱ्यांकडून लूट मिळवून त्यांचे समाधान होण्यासारखे नव्हते. राज्यातील शेतकऱ्यांवर दबाव आणण्यासाठी तयार केलेली फौज आसपासच्या राज्यावर चालून जाण्याकरिता राबवली जाऊ लागली. या लढाया जो जिंकेल तो सार्वभौम राजा. जो हरेल तो मांडलिक राजा. मांडलिक राजाच्या

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १४