पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महत्त्वाचे वाटतात. साहजिकच या प्रत्येक राष्ट्रातील राज्यकर्ते आपणास सोईस्कर अशी धोरणे आखण्याचा प्रयत्न करीत आहेत. (पंढरपूर)

 आर्थिक विकासाला निर्भेळ मदत करण्याची साम्राज्यवादी राष्ट्रांची इच्छा नाही हे स्पष्ट झाले. साहजिकच नवोदित स्वतंत्र राष्ट्रातील परस्परसहकार्य व समाजवादी राष्ट्रांकडून आर्थिक व तांत्रिक मदत घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे. (सांगली)

 आशिया व आफ्रिका खंडातील अमेरिकन अस्तित्वाला व वर्चस्वाला आफ्रिकेतील नवोदित राष्ट्रांनी व अरब राष्ट्रांनी प्रचंड धक्का दिला आहे. (कोल्हापूर)

 थोडक्यात तिसऱ्या जगातील राष्ट्रांत फक्त भारत हा एकच असा अपवाद, की जेथील शासन वसाहतवादी अर्थव्यवस्था राबवते. बाकी सर्व राष्ट्रे आपापल्या देशांचा आर्थिक, सामाजिक विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यश मिळत असो वा नसो.

 या अपवादात्मक भारतीय शासनात बदल कसा घडवून आणता येईल ?

 कामगारांना वर्गजागृत करणे व सर्व लोकशाही मोर्त्यांवर त्यांचे पुढारपण प्रस्थापित करणे.

 भांडवली लोकशाहीचा पडदा भांडवलदारांची हुकूमशाही जनतेपासून लपविण्याच्या कामीच उपयोगी पडतो अशी मार्क्सवादाची शिकवण आहे. अशा परिस्थितीत भांडवलशाही कायद्याच्या चौकटीत कामगार-शेतकऱ्यांची सत्ता प्रस्थापित करण्याची घोषणा करणे म्हणजे जनतेची फसवणूक करणे होय. (दाभाडी)

 गंमत म्हणजे लोकशाही चौकटीबाबत कोल्हापूरच्या ठरावात पुढील वाक्य आहे.

 खऱ्या अर्थाने जनतेनेच ही निवडणूक संघटित केली व काँग्रेसचा प्रचंड पराभव केला. १. या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भारतीय लोकशाही जिवंत आहे हे सिद्ध झाले. २. निवडणुकीच्या मार्गाने सरकार बदलता येते हा जनतेत नवा विश्वास निर्माण झाला.

 गरीब बिचारी मार्क्सवादाची शिकवण! जे जे घडले ते ते मार्क्स, एंजल्सच्या आधाराने घडणे अपरिहार्यच होते, असे सिद्ध करणे या प्रयत्नात शेकापच्या नेत्यांची होणारी तारांबळ मोठी मनोरंजक आहे.

 भारत पाश्चिमात्य बड्या व भांडवलदारी राष्ट्रांचा प्रत्यक्षात अनुनयच करीत आला. त्यामुळे कच्छप्रकरणी पाकिस्तानच्या आक्रमणाचा निषेध एकाही आफ्रिका वा आशिया खंडातील स्वतंत्र राष्ट्राने केला नाही. यावरून भारत किती एकाकी पडला आहे याची कल्पना येते. (पंढरपूर)

 याचा अर्थ भारतापेक्षा पाकिस्तान जास्त खऱ्या अर्थाने तटस्थ आहे असा

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १२९