पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ब्राह्मण, मुसलमान तसेच त्यानंतर आलेले इंग्रज यांच्या राजवटीचे स्वरूप मूलत: शहरी होते. शोषणाचे हे कॅन्सर मोक्याच्या जागाच पकडतात. इंग्रजांनंतर देशावर अंमल चालविणाऱ्या 'इंडिया'चे स्वरूप याच कारणाने शहरी आहे. असो.

 ग्रामीण भागात ब्राह्मणांची घरे गेल्या शंभर वर्षांत आणखीनच कमी झाली आहेत. सर्वसाधारणपणे भावंडांतील एकच खेड्यावर सोडून बाकीचे सगळे शहरात कामधंद्याकरिता, उद्योगधंद्याकरिता निघून गेले आहेत.

 गावाशी एवढेच नव्हे तर गावांतील नातलगांशी त्यांचे संबंध जगदी जुजबी. सावकारांविरुद्ध झालेल्या उठावामुळे, दरवडेखोरांमुळे ब्राह्मण ग्रामीण भागांतून संपत आला आहे. मराठवाड्याचीही स्थिती तीच. उलट मुसलमानांची ग्रामीण भागातील संख्या वाढत आहे. मुलाण्याच्या कामासाठी गावोगावी मुसलमानांना वस्तीसाठी बोलावून नेले जाते. गांधीवधानंतरच्या जाळपोळीत ब्राह्मण मोठ्या प्रमाणावर शहराकडे आले आणि त्यानंतर कूळ कायद्याच्या अंमलबजावणीत फारच थोड्या ब्राह्मणांना आपल्या जमिनी लपवता आल्या. परिणामत: खेडेगावातील ब्राह्मण आज आर्थिक दृष्ट्या नगण्य झाला आहे. गावातील राजकारणात, एवढेच नाही तर राज्यातील राजकारणातील त्यांचे महत्त्व बऱ्याच प्रमाणात छाटून टाकण्यात आले आहे. देशपातळीवर मात्र आजही ब्राह्मणांचे राजकारणातही त्यांच्या संख्येच्या मानाने फार मोठे प्रभुत्व आहे.

 उदाहरणार्थ, लोकसभा व राज्यसभा यांमधील ब्राह्मण खासदारांचे प्रमाण पाहा.

 ब्राह्मण खासदारांचे संसदेतील प्रमाण (%)

इसवी सन   लोकसभा   इसवी सन   राज्य सभा
१९५२ ३५ १९५२ २७
१९५७ ४७ १९५७ ४७
१९६२ ४१ १९६० ४९
१९६७ ३७ १९६४ ४३
१९७१ ३४ १९६८ ४५
१९७७ २५ १९७० ५०
१९८० ३६ १९७४ ४७
१९७८ ३४
१९८० ३६

 राज्यपाल, मंत्री, मुख्य सचिव, न्यायाधीश वगैरे उच्चपदांवरही ब्राह्मणांचे प्रमाण

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ११७