पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/40

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८. एक अशक्य गुणोत्तर ?

 ठाणे शहराची लोकसंख्या आहे १८,१८,८७२. ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आहेत २३५९, रस्ता साफसफाई कर्मचारी आहेत ९२५, घंटागाडीवरील कर्मचारी आहेत ४०४, आणि कचरा वेचक आहेत ३४४. अशी सर्व मिळून ४०३२ माणसे ठाणे शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करणार ! यांचे गुणोत्तर काढल्यास १८,१८,८७२/ ४०३२ = ४५१.११ असे उत्तर येईल. याचाच अर्थ ४५१ माणसे कचरा करणार आणि एक माणूस त्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणार !

कसे शक्य आहे हे ?
हे गुणोत्तर जेव्हा एक येईल तेव्हाच कचऱ्याचा प्रश्न सुटेल. जो कचऱ्याचा जन्मदाता, तोच त्याचा पालक. पालकाने आपल्या कचरारूपी पाल्याची जबाबदारी टाळून कसे चालेल ? म्हणूनच आपण निर्माण करत असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन प्रत्येकाने स्वतःच केले पाहिजे. ते प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.

३८ * शून्य कचरा