पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वि. स. खांडेकरांच्या रूपककथा



 वि. स. खांडेकर हे मराठीतील चतुरस्र साहित्यिक होत. त्यांनी मराठीत कथा, कादंबरी, लघुनिबंध, नाटक, विनोद, काव्य, पटकथा, समीक्षा, व्यक्तिचित्रे - असं सर्व प्रकारचं लेखन केलं. पण मराठी साहित्य खांडेकरांचं ऋणी राहील ते त्यांच्या रूपककथा लेखनामुळे. रूपककथा ही खांडेकरांनी मराठी साहित्याला दिलेली अनमोल देणगी होय.

 रूपककथा आपणास जगातील सर्व भाषांत कमी-अधिक प्रमाणात आढळून येतात. रूपककथेची सुरुवात मात्र भारतातच झाली. रूपककथेचं पहिलं बीज आपणास ऋग्वेदाच्या उषा-सूक्तात आढळतं. दृष्टांतातूनही सांगितलेलं मर्म, हे रूपककथेचं वैशिष्ट्य असतं. अशा कथा उपनिषद व महाभारतातही दिसून येतात. विश्व साहित्यात विष्णू शर्मा, इसाप, खलील जिब्रान, स्टीफन झ्वाइग, ख्रिश्चन जेलर्ट, टॉलस्टॉय, ट्राहर्न, ब्लॅकसारख्या कथाकारांनी रूपककथा रूढ केली. भारतीय साहितयातील आधुनिक काळात रवींद्रनाथ ठाकुरांप्रमाणे वि. स. खांडेकरांनी पिपुल रूपककथा लिहिल्या आहेत.

 खांडेकरांच्या रूपककथा कशा सुरू झाल्या हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यांनी पहिली रूपककथा हेतुतः लिहिली नाही. सन १९३० चा तो काळ होता. भारतात धार्मिक दंगे सुरू होते. त्या दंग्यांनी दुःखी झालेल्या खांडेकरांनी ‘स्वप्नातले स्वप्न' नावाची एक सामाजिक कथा लिहिली. ती 'यशवंत' मासिकाच्या सन १९३२ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर अंकात प्रकाशित झाली. ती कथा ते लिहीत गेले आणि त्या कथेच्या उत्तरार्धाने प्रतीकांचं रूप धारण केलं. हा उत्तरार्ध म्हणजेच 'चकोर आणि चातक' ही खांडेकरांची पहिली रूपककथा, काही समीक्षक ‘सागरा, अगस्ती आला' कथेस पहिली रूपककथा

शब्द सोन्याचा पिंपळ/८३