पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/191

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ : कार्य आणि योगदान




 मराठी भाषा आणि संस्कृती विकासासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करून महाराष्ट्राच्या जनतेने त्यासाठी दीर्घकाळ लढा दिला. त्यानंतर १ मे, १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र राज्याची मुहर्तमेढ रोवली गेली. नामदार यशवंतराव चव्हाण मराठी भाषिक स्वतंत्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या विकासाचे स्वप्न स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणून दिलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, ‘‘महाराष्ट्र ही भूमी अनेक संत, पराक्रमी वीर, त्यागी समाज सुधारक व विद्वान, देशभक्त यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व लोकमान्य टिळक ही आमची प्रातिनिधिक प्रतीके आहेत. त्यांनीच महाराष्ट्राच्या संस्कृतीची जोपासना केली व तिचा वारसा आपल्या हाती दिला. हा अमोल ठेवा आपल्या हृदयात जपून ठेवणे व त्याचा विकास करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे आद्य कर्तव्य ठरते. आज आपले मराठी भाषी राज्य स्थान होत असताना आपल्या देशाची भरभराट करण्यास व त्याची कीर्ती दिगंत पसरविण्यास आपले शक्तिसर्वस्व देऊ अशी आपल्यापैकी प्रत्येकाने प्रतिज्ञा केली पाहिजे." या प्रतिज्ञेनुसार महाराष्ट्र शासनाने १९ नोव्हेंबर, १९६० रोजी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ' स्थापन केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. त्यात सर्वश्री महामहोपाध्याय वि. वि. मिराशी, डॉ. ए. एम. घाटगे, प्राचार्य

शब्द सोन्याचा पिंपळ/१९०