‘अजून जिवंत आहे मी तुमचा कवी, खाली होत राहीन कथा ऐकवित...' माझ्या मुठीत मेघझरा आहे, म्हणणारा हा कवी मोठा आत्मविश्वासी परिवर्तक आहे. त्याला वर्तमानाचं भान आहे आणि जाणही-
साला आपण लोगच पांडू है
इसलिये इंडिया का पॉलिटिक्स गांडू है...
म्हणणारा कवी लेचापेचा, येरागबाळा नाही. त्याची नाळ मातीशी अन् इथल्या मतांशी थेट नि ठोक जोडलेली आहे.
आम्ही पेरीत नसतो युद्ध
आम्ही निर्मित असतो बुद्ध
असे ठणकावून सांगणारे सुर्वे विरोधकांची बोलती बंद करण्यात तितकेच वाकबगार दिसतात. नफ्याचे सरेना लष्कर असा इशारा देणारा कवी जागतिकीकरणाची एका अर्थाने भविष्यवाणीच करतो.
हक्कांनी उठविले वेद
शूद्र झाला इथे स्वेद
हे या कवीचं शल्य आहे. त्याचा राम घामात निथळतो अन् त्याचा घाम कामातच दंग असतो, असे न्यारं जग दाखविणारा हा कवी आपल्याला सोडून गेला तेव्हा योगायोगाने मी त्यांच्याजवळच होतो. ते आणि मी बाळगलेला पोर असल्याच्या नात्याने कवी नारायण सुर्वे माझे वडील बंधू होते. स्थिती, संघर्ष, विचार, व्यवहार सा-या अर्थांनी त्यांचं शव अंत्ययात्रेसाठी लोकवाङ्मयगृहात आणलं तेव्हा कडा पाणावणं एक उपचार होता, पण वारंवार आठवत होत्या काही ओळी...
माझीही अंत्ययात्रा राजपथावरून सरकेल
कुणीतरी अजान देईन, कुणातरी हुंदका फुटेल...
कवी सुर्वे यांना वाचासिद्धी होती म्हणायची... त्यांची अंत्ययात्रा राजपथावरून जावी अशा शासकीय इतमामानेच निघाली होती. फौजफाटा होताच पण कामगारांची फौजही होती.
कॉम्रेड नारायण सुर्वे,
लाल सलामलाल सलाम!
कॉम्रेड सुर्वे, अमर रहे।
असा घोष करणारा जनसमुदाय त्यांनी घराघरात ठेवलेल्या मुठी घेऊन आला होता. त्या मुठी उंचावत त्यांना पोलिसांना एकवीस फैरी झाडून