पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/१७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मानसिक दडपणाशी सामना
१९९
 

 हे इथेच थांबत नाही. व्यवस्थापकाने साधनसामग्री आणि काम मिळवून त्याचे उत्पादनात यशस्वी रूपान्तर केल्यावर तो स्वतः त्या पिळवणुकीचा बळी ठरतो. मालकवर्ग आणखी चांगल्या यशाची मागणी करतात. तुम्ही जर एखाद्या सर्वसाधारण वार्षिक सभेला (अॅन्युअल जनरल मिटींग) हजर राहिलात तर तुम्हांला हे दिसून येईल. तुम्ही जर १० टक्के लाभांश घोषित केला तर दहा भागधारक ध्वनिक्षेपकाजवळ येऊन म्हणतील, “तुम्ही १५ टक्के लाभांश का जाहीर करीत नाही? आम्ही जर आमचे पैसे कर्जरोख्यांमध्ये, बंधपत्रांमध्ये गुंतविले असते तर आम्हांला १० टक्क्यांहून अधिक लाभांश मिळाला असता!" जर तुम्ही २० टक्के लाभांश घोषित केला तर २० भागधारक ध्वनिक्षेपकाजवळ येऊन म्हणतील, “तुम्ही लाभांश २५ टक्के कधी करणार आहात? तुम्ही अधिलाभांश भाग (बोनस शेअर) कधी जाहीर करणार आहात?" तुमच्या लाक्षात येईल, मालक मंडळी कधीच समाधानी नसते. ते व्यवस्थापक मंडळीकडून अधिकाधिक वसुली करीत राहतात.

 त्याचप्रमाणे, कामगारांना दर तीन वर्षांनी कळते की त्यांची उपासमार होतेय, पिळवणूक होतेय. ते फलक नाचवतात, “गली गली में शोर है, मॅनेजमेंट चोर है।" ते का करतात असे? ती तशी चांगली माणसे असतात. पण दर तीन वर्षांनी ते सुद्धा काहीतरी वसूल करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे खरोखरच व्यवस्थापन हा वसुलीचा, पिळवणुकीचा खेळ आहे_‘रक्तरंजित' खेळ म्हणा हवं तर. 'रक्तरंजित' हा शब्द कबीराच्या एका दोह्यातील आहे. कबीर म्हणतो,


"सहज मिले तो दूध समा
मांगी मिले तो पानी
कहत कबीरा वो खून है।
जमाय खिचातानी."

 (न मागता तुम्हांला मिळते ते दुध; तुम्हांला मागावेच लागत असेल तर ते पाणी, आणि तुम्हांला पिळवणूक करून घ्यायचे असते ते रक्त.)


 त्यामुळे हा सगळा रक्तरंजित खेळ आहे! पण आपल्यावर तणाव असल्याची तक्रार करणाच्या व्यवस्थापकाविषयी माझ्या मनात काडीचीही सहानुभूती नाही. माझ्यासाठी ते एखाद्या परिचारिकेने तक्रार करण्यासारखे आहे,"मला कोणत्याही घाणेरड्या वस्तूला हात लावायचा नाही. मला रुग्णाच्या शौचपात्राला (बेडपॅन) हात लावायचा नाही." मी म्हणेन, “जर तुला रुग्णाच्या शौचपात्राला हात लावायचा नसेल तर शिक्षिका हो. मृग तुला त्या शौचपात्राला हात लावायला कुणीही सांगणार नाही.जर