पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/१७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९२
व्यवस्थापनाची मूलतत्त्वे
 

सुसंवादाची प्रक्रिया वेगवान होऊ शकते. मंदगतीने चाललेल्या बोलण्याचा वेग वाढविण्याचा दुसरा एक मार्ग म्हणजे सगळे बोलणे ‘हो, नाही' इथवर आणणे. अशा व्यक्तीला थोडक्यात 'हो' किंवा 'नाही' अशी उत्तरे द्यायला लावून सुसंवाद वेगवान करता येतो.


उपाययोजना घेऊन आलेला माणूस

ज्याचे बोलणे अवघड असते अशी दुसरी एक व्यक्ती म्हणजे ज्याच्याकडे एखाद्या समस्येवरचा उपाय असतो आणि तुम्ही त्या उपायाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी त्याची इच्छा असते. यात तो कार्यकारी अधिका-याला थेट आदेश देत असल्याचा प्रकार असल्याने यातून तिटकारा निर्माण होतो. काही वेळा 'हे करा नाहीतर...' अशा स्वरूपाची धमकी त्यात असते आणि या स्पष्ट धमकीमुळे वैरभाव आणखी वाढतो. त्या बोलू पाहणा-या व्यक्तीकडे खरोखरीच काही चांगल्या कल्पना असू शकतात. पण त्याच्या सांगण्याच्या पद्धतीमुळे निर्माण होणा-या वैरभावामुळे कार्यकारी अधिकारी त्याचे म्हणणे ऐकण्यापासून परावृत्त होऊ शकतो. या ठिकाणी वापरायचे तंत्र म्हणजे त्या व्यक्तीला त्याने सुचविलेल्या उपायाविषयीचे श्रेय देणे आणि नंतर विचारणे, ‘याची अंमलबजावणी करण्यात तुम्हांला काही अडचणी दिसतात का?' यामुळे त्याला त्याने सुचविलेल्या उपायाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे लागते. यानंतर वस्तुनिष्ठ मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. येथे ऐकण्याचे महत्त्वाचे तंत्र म्हणजे बोलणा-याला आणि ऐकणाच्याला - दोघांना एकमेकांविरुद्ध ठेवण्याऐवजी एकाच बाजूला घेणे.

संदिग्ध बोलणारा

आणखी एक व्यक्ती म्हणजे संदिग्ध उपाय घेऊन आलेली व्यक्ती. यात, त्या व्यक्तीला समस्या किंवा उपाय यापैकी कशाचीही ठाम खात्री नसते. त्याची एक संदिग्ध अशा तक्रार असते - पण स्पष्ट समस्या नसते. अशा व्यक्तीविषयी अस्वस्थ होण्याची आणि त्याच्या दुर्बलतेबद्दल त्याला हसण्याची, त्याची खिल्ली उडविण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते. पण यामुळे तो आणखी वैफल्यग्रस्त होतो आणि तुमच्यावर अधिक रागावतो. अशा व्यक्तीशी बोलण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला चिंतनशील प्रश्न विचारणे ज्यात त्याच्या चिंतेचे प्रतिबिंब असेल - म्हणजे त्याचे म्हणणे त्याच्याचकडे परत आणणारा एक आरसा त्याला दाखविणे. 'तुम्ही अमुक अशी परिस्थिती आहे