पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२, वैदिक तत्त्वमीमांसा असे ज्ञान प्राप्त झाल्या वर मग, दुस-या कोणत्याही फळा विषयीं, किंवा ते फळ प्राप्त होण्याला साधनीभूत जें कमचरण त्या कर्माचरणा विषयीं, इच्छा राहणे किंवा उत्पन्न होणे शक्य नाही. ज्याच्या पासून राज्य प्राप्ति निश्चितपणे होणार अशा साधनाचा ज्याने अंगिकार केला आहे, तोच मनुष्य त्या राज्यांतील एकादें शेत मिळविण्याचा प्रयत्न करील, इतकेच नव्हे तर त्याच्या मनामध्ये तत्-विषयक इच्छा उत्पन्न होईल, ही गोष्ट अशक्य आहे.' अत्र अपरे प्रत्यवतिष्ठन्ते । यद्यपि शास्त्र-प्रमाणकं ब्रह्म तथापि प्रतिपत्ति-विधि-विषयतया एव शास्त्रेण ब्रह्म समप्यते । ....कुतः एतत् । प्रवृत्ति-निवृत्ति प्रयोजनत्वात् शास्त्रस्य ।°००० तस्मात् प्रतिपत्ति-विधि-विषयतया एव शास्त्र-प्रमाणकं ब्रह्म अभ्युपगन्तव्य इति । अत्र अभिधीयते । न । कर्म-ब्रह्मविद्याफलयोः वैलक्षण्यात् ।” “धर्म-अधर्म-तारतम्य-निमित्तं.... सुखदुःख-तारतम्यं नित्यं संसाररूपं....। नित्यः च मोक्षः सर्वैः मोक्षवादिभिः अम्युपगम्यते । अतः न कर्तव्य-शे- पत्वेन ब्रह्म-उपदेशः युक्तः । अपि च * ब्रह्म वेद ब्रह्म एव भवति '....इति एवं आद्याः श्रुतयः ब्रह्मविद्या-अनन्तरं मोक्षं दर्शयन्त्यः मध्ये कार्यान्तरं वारयन्ति ।....तस्मात् ज्ञानं एकं मुक्त्वा क्रियायाः गन्धमात्रस्य अपि अनुप्रवेशः इह न उपपद्यते ॥ ( शारीरकभाष्य, १॥ १।४ ) ह्मणजे, कांहीं असे प्रतिपादन करतात की, जरी धर्मग्रंथांच्या अध्ययनाने ब्रह्मा विषयांचे ज्ञान प्राप्त होते तथापि ते ज्ञान, धर्मग्रंथां मध्ये ज्या कर्माचरणाचा उपदेश केलेला आहे, त्या कर्माचरणाला साधनीभूत आहे असे समजले पाहिजे.