पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रेझेंट सर! : अनुभवकथनातून शिक्षणाचे महत्त्व

 सरोजिनी बाबर यांनी आपल्या समाजशिक्षण मालेद्वारे अनौपचारिक लोकशिक्षण व प्रबोधनाचे जे कार्य शासकीय आश्रयावर केले तेच कार्य प्राचार्य रा. तु. भगत लोकाश्रयावर करीत आहेत. म्हणून त्यांच्या पुस्तकांचे आगळे महत्त्व राहते. लोकशिक्षण हा शासकीय प्रचार न होता तो संस्कार व्हावा म्हणून प्राचार्य रा. तु. भगत यांची धडपड त्यांच्या २९ व्या प्रकाशनातही प्रतिबिंबित होते.
 ‘प्रेझेंट सर!' हे त्यांचे काहीसे आत्मकथनपर पुस्तक. पण त्याला आत्मकथा म्हणता येणार नाही. कारण आत्मकथेची समग्रता त्यात नाही. आपल्या जीवन घडणीतील निवडक प्रसंग त्यांनी या पुस्तिकेत कथन केले आहे. शिक्षणाचा गंध नसलेली घरा-समाजातून वर येणारी माणसे, त्यांचे वर येणे हे काय दिव्य असते हे या पुस्तिकेत अनेक प्रसंगाने स्पष्ट होते.
 समाज ही शिक्षणाची खरी शाळा, पोचट शिक्षण कुचकामी, आईआजीच्या कुशीतच शिक्षणाचे खरे अंकुर फुटतात, ते फुटायला ‘टू इन वन' चे दिव्य सोसावे लागते. शिक्षण म्हणजे शब्दार्थ नव्हे. शिक्षणातून एखाद्यास बहिष्कृत करण्याचा रामबाण उपाय म्हणजे नापास करणे, शिक्षणाने जोपासलेली इंग्रजी संस्कृती आदी कितीतरी विचार या पुस्तिकेत वर्णिलेल्या छोट्या छोट्या प्रसंगातून, अनुभवांचा अन्वयार्थ म्हणून समोर येतात. शिक्षण समाजापर्यंत पोहोचवणे का व कसे आवश्यक आहे, माणूस घडवणारे शिक्षण दिले गेले तर वाल्याचा वाल्मीकी होण्यास वेळ लागत नाही हे पुस्तक वाचताना प्रत्यही जाणवते. प्राथमिक व प्रौढ शिक्षण स्तरावर अशा पुस्तिकांचे वाचन व्हायला हवे. या स्तरांवर अक्षर ज्ञानावर भर देण्यापेक्षा अशी अनुभव कथने समोर




वेचलेली फुले/४७