बाभळीची फुलं : महारोग्यांच्या व्यथांच्या कथा
अजंठा, वेरूळच्या पाषाणातील भग्न शिल्पांचे सौंदर्य रसिकतेने पाहणारा मानव जिवंत माणसांतील भग्न शिल्पांना नेहमीच नाकारत आला आहे. मानवाच्या या घृणित नकारात्मक प्रवृत्तीतून उद्ध्वस्त झालेल्या महारोग्यांच्या व्यथा नि वेदनांचा उग्र दर्प देणारी ही ‘बाभळीची फुलं' डॉ. स. ग. यादव यांनी पाऊणशे पृष्ठांच्या कादंबरीच्या रूपाने वाचकांपुढे सादर केली आहे.
| मर्यादित पृष्ठ संख्या व कथानकातील घटनांचे बाहल्य एखाद्या ‘अॅक्शनपॅक्ड चित्रपटाला साजेल असे बनले आहे. शुभा नि यश यांची ही अशी प्रेमकथा आहे, तशीच ती अनंतराव, रोहिणी, सावित्री इ. च्या दुव्यांमुळे एक सामाजिक आशय घेऊनही पुढे येते. शुभा नि यशच्या विवाहानंतर यश महारोगाचा बळी ठरतो. तरीही शुभा यशशी एकनिष्ठ राहते. आपल्या या शोकान्तिकेचा शोध लावताना तिच्या लक्षात येते की शंकरकाकापासून या रोगाचा फैलाव आपल्या कुटुंबात झाला आहे. आपल्या शोकान्तिकेस कारणीभूत असलेल्या या वासनाग्रस्त काकाचा खून करून ती बदला घेते. आपल्या पोटी जन्माला येणा-या मुलास बाभळीचे काटे टोचू नयेत, फुले मिळावीत म्हणून!
अलीकडच्या मराठी साहित्यात वसंत कानिटकरांनी नाटकाचा विषय म्हणून महारोग्यांच्या जीवनाला स्वर दिला. कादंबरीच्या स्वरूपात डॉ. यादव यांनी त्या स्वरांना अधिक आर्द्रता देण्याचे काम केले आहे. महारोग्यांच्या जीवनाबरोबरच यात ‘समलिंगी संभोग' (होमोसेक्स) सारखा वादग्रस्त विषय हाताळण्याचे धाडस लेखकाने केले असले, तरी ते अर्नेस्ट हेमिंग्वे इतके वादग्रस्त होईल असे नाही. कादंबरीच्या आत्मकथनात्मक शैलीमुळे पात्रे व वाचक यात कुठे दरी रहात नाही. आता फक्त मी उरलो होतो एक वासनेचे झाड. एक नर, मला हवी होती एक मादी, भोगलालसा शमवायला', अशा छोट्या छोट्या वाक्यरचनेत सांकेतिकता आहे. 'डोळ्यात दिवे पेटवत होतो',
वेचलेली फुले/१९
पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/20
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
