पान:वनस्पतिविचार.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

शोषित अनेंद्रिय ( Inorganic ) द्रव्यांपैकी पुष्कळवेळां कांहीं द्रव्यें पेशीस निरुपयोगी असतात, त्यापासून सेंद्रिय पदार्थ वनस्पति बनवीत नाहीत, अथवा अन्नद्रव्याप्रमाणे त्यांचा उपयोग करीत नाहीत, असली द्रव्ये खरोखर पेशीबाहेर टाकिली पाहिजेत. पण वनस्पतींत अशी निराळी योजना नसते की, ज्यायोगाने असल्या त्याज्य वस्तु सहज बाहेर टाकितां येतील. ह्मणून असल्या निरुपयोगी वस्तू पेशी भित्तिकेमध्ये सांठविल्या जाऊन वेळ आली ह्यणजे भित्तिका झडून जाते व त्याबरोबर त्या बाहेर टाकल्या जातात. तृणजातीच्या वनस्पतीमध्ये पानांत नेहमी चमकणाऱ्या वाळूचे कणसूक्ष्म आढळतात. रबर, पिंपळ, वड वगैरे वनस्पतीत पानाच्या उपरी (बाह्य) त्वचेत (Epidermis) असली निरिंद्रिय द्रव्ये आढळतात. बिगोनियाची पाने, कांद्याच्या पाती वगैरेमध्ये हीं निरिंद्रिय द्रव्ये निरनिराळ्या आकृतींत आढळतात. एकंदरीत पेशभित्तिका केवळ साध्या सात्विक घटक द्रव्याची नसून त्यांत वरील प्रकारची निरिंद्रिय द्रव्ये सांपडतात.

 केद्र:—(Nucleus) केंद्राचा आकार सजावत्वापेक्षां स्पष्ट असून केंद्रद्रव्यें जीवनकणासारखी असतात, केंद्रामध्ये केंद्रबिंदू (Nucleolus ) असतो, केंद्रद्रव्यांत फॉस्फरसयुक्त कांही कण आढळतात. त्या कणास पेशीचे मेंदुस्थान समजण्यांत येते. जेव्हां पेशीमध्ये पाणी अधिक झाल्यावर जडस्थाने तयार होऊ लागतात, त्यावेळेस केंद्र आपले मूळचे स्थान सोडून बाजूस जाते. जीवनकण परिघाकडील बाजूस चिकटून राहतात. केंद्राचा व जीवनकणांचा संबंध बारिक तंतूमधून असतो. हे तंतू जीवनकणांचे बनले असून जडस्थानास (Vacuole) टेंका देण्यास उपयोगी पडतात.

 सजीवतत्त्वांचे कण भित्तिका तयार करण्यांत अथवा ती मोठी वाढविण्यांत खर्चिले जाऊन त्याबरोबर शोषित द्रव्यापासून नवीन सजीव कण उत्पन्न होत असतात. पेशी पूर्ण वाढल्यावर आंतील सजीव तत्व कमी होते व शेवटी ती मृतप्राय होते, मृत होण्यापूर्वी नवीन पेशी उत्पन्न होऊन त्यामध्ये पूर्ववत चैतन्यशक्ति येते. जुन्या पेशीचे काम फार दिवस सजीव प्रकारचे नसते, कायम स्वरूप प्राप्त झाल्यावर पेशीच्या अस्तित्वामुळे दुसऱ्या पेशीस आधार व संयोगशक्ति ह्याशिवाय दुसरे कार्य त्याकडून होत नाहीं. अथवा रसाची नेआण करणे वगैरे कामाकरितां कांही दिवस उपयोगी पडतात. पण पुढे ह्या कामा-