पान:वनस्पतिविचार.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१ लें ]     सजीव व निर्जीव वस्तूंची मिमांसा.     



-----

कारणांमुळे ह्या पर्वतांची कालांतराने पूर्ववत् वाळू बनेल, म्हणजे पूर्वीच्या वाळूत कोणत्याही प्रकारचा रासायनिक फरक न होतां फक्त कणांच्या कमी-अधिक संख्येप्रमाणे बाह्यदृश्य आकारांत फरक होत असतो.

 आतां सजीव पदार्थांचा विचार केला असता असे आढळेल की, त्याही पदार्थांस वाढ असते. बीं जमिनीत पेरून त्यास माफक ओलावा देण्याची व्यवस्था केली असता त्यापासून अंकुर फुटू लागतात. प्रथम लहान रोपा तयार होऊन पुढे त्यावर पाने, फांद्या, कळ्या, फुले, फळे, वगैरे क्रमाक्रमाने येत जातात. कदाचित तो रोपा अति मोठा होऊन त्याचा वृक्ष तयार होईल, अथवा लहानच झुडुपासारखा राहील. कांहीं काल तो वृक्ष अगर रोपा वाढत जाऊन त्यावर पाने, फुलें, वगैरे येत जातील. नंतर तो वृक्ष जुना होऊन, सृष्टिनियमानुसार त्याच्या फांद्या सुकू लागतात. हळू हळू तो वृक्ष जसा आला तसा समूळ नाहीसा होऊन जातो. खरोखर वृक्षांची वाढ म्हणजे विशिष्ट वस्तूंची वाढ असते. पण त्या वस्तूंच्या मूलस्थतीत व मागाहून वृक्षाच्या स्थितीत महदंतर असते. शेंकडों निरनिराळी रासायनिक कार्ये त्यावर घडून त्याचे स्वरूप अगदी बदलून गेले असते. जमिनीच्या मातीपासून अथवा वातावरणांतील वायूपासून वृक्षाची रचना होत असते खरी; पण मातीचे रूप अगर वातावरणांतील वायुतत्त्वें वृक्षांत जशीच्या तशीं सांपडणार नाहींत. माती अथवा वायु तत्वें निर्जीव असून वृक्षाच्या शरीरांत त्यांचे सात्मीकरण ( assimilation) होऊन त्यापासून जीवनकार्ये घडू लागतात. सजीव वस्तूस निर्जीव पदार्थांना आपलेप्रमाणे करण्याची शक्ति आहे. अशी शक्ति निर्जीव पदार्थांमध्ये नसते. निर्जीव वस्तूंची वाढ म्हणजे पुष्कळ निर्जीव कणाचे एकीकरण होय. त्याचे विघटीकरण केले असता त्यांत रासायनिक फरक झालेले दिसत नाहींत. ज्या स्थितीत त्यांचे एकीकरण होते, त्याच स्थितीत त्यांचे विघटीकरण होते. सजीव वस्तु निर्जीव वस्तूंचे एकीकरण करून त्यांस सजीवत्व आणितात. ह्या कार्यात आवश्यक रासायनिक फरक, तसेच इतर मिश्रीकरणे होत असतात.

 हे सजीव तत्त्व दोन तऱ्हेने दृश्य झालेले आहे. दोन्हींचा प्रथम ओघ सारखाच असून पुढे ते दोन्ही ओघ अगदी उलट दिशेने गेल्यामुळे त्यांत अत्यंत