पान:वनस्पतिविचार.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

तयार होतात. ही फळे फुटून बीजे बाहेर गळतात. शेंगेचे निमुळते अग्र हें परागवाहिनीचा अवशिष्ट भाग होय, फळांवर पुष्पकोश कायम राहतो.

 बाभूळ, खैर, वगैरे बीजे शेंगेसारखी असून ती फुटत नाहींत. प्रत्येक खणांत एक एक बीज असते.

 तृणजातीच्या फळास दाणे म्हणतात. प्रत्येक दाण्यावर फळाची खुण स्पष्ट असते. ह्या फळांत निराळीं बीजे दाखविता येत नाहीत. कणीस म्हणजे फळांचा गुच्छ होय, फुलामध्ये अधिक स्त्रीकेसरदले असुन फळांत ते एकच राहते. फळांतील एका बाजूस असणारा गर्भ म्हणजे येथील बीज होय. असल्या फळांत एकच बीजदल असते. ही फळे कधीही फुटत नाहींत.

 एरंडी वर्गातील फळे नेहमी त्रिदळी असून दले वेगळी होतात. जिरे, धने, सोपा, वगैरेमध्ये फळे द्विदली असून प्रत्येक दलांत एक बीज असते. येथे पुष्पाधार वाढून त्यास दोन्ही दले चिकटली असतात. मधुमालती, पापडी, वगैरे फळांमध्ये दोन पक्ष असतात; त्यामुळे ती फळे हवेतून वाऱ्याने सहज इकडे तिकडे जाऊ शकतात.

 पेरु, घोसाळी, दोडके, भोपळे, वगैरेमध्ये फळे मांसल होऊन ती फुटत नाहींत. बीजे पुष्कळ असून ती परिघाकडील बाजूस नाळेशी चिकटलीं असतात. पेरुंचीं बीजें सुटी होऊन गीरांत बुडाली असतात. घोसाळ्यात ती सुटी न होता त्यांचा नाळेशी संबंध तसाच कायम असतो. गीराची उत्पत्ति नाळेच्या मांसल पेशीसमुच्चयापासून होते.

 लिंबूवर्गाची फळे वाटोळी व मांसल असतात. फळाची साल जाड असून त्यांत सुवास उत्पन्न करणारे तेलोत्पादक पिंड असतात. प्रत्येक फांकेवर तंतुमय वेष्टण असून मध्यभागी त्याचे जणू दोरखंड बनते. प्रत्येक फाकेंत दोनपासून चारपर्यंत बीजे असतात. असली फळे हा वर्ग खेरीज इतरत्र असत नाहींत.

 मोहरी, शिरस, गोभी, वगैरेमध्ये फळे शेंगेसारखी असून त्यांत एकाऐवजी दोन स्त्रीकेसरदले असतात. शिवाय दोन्ही नाळांचा संबंध एकत्र येऊन मध्य भागी पातळ पापुद्रा उत्पन्न होतो. ह्यास बीजे चिकटतात. फळे बुडाकडून