पान:वनस्पतिविचार.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१२८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

असणे ह्यांत तात्त्विकदृष्ट्या विशेष फरक कांहींच नसतो. जसे श्वासोच्छवास क्रियेमध्ये वस्तू जळते, त्याचप्रमाणे येथे अलग केलेल्या ऑक्सिजन् वायूचे योगाने सात्विक सेंद्रिय पदार्थ जळले जातात. त्यांची संकीर्णता मोडून जाते. आंबण्याची क्रिया अथवा सडण्याची क्रिया कांहीं विशिष्ट उष्णतेमध्ये चालू राहते. शिवाय निरनिराळ्या आळंब्याकडून होणारी ही नासधूस वेगवेगळ्या प्रकारची असते. भयंकर सांथीचे रोग वगैरे ह्या आळंब्यावर्गीय बॅॅक्टिरिया जंतूकडूनच उत्पन्न होतात.

 पाचकरस अथवा आंबणे ह्या दोन्ही गोष्टींचा मुख्य उद्देश सेंद्रिय पदार्थाचा उपयोग होऊन सजीव तत्त्वाच्या घटकायवास भर घालणे अथवा नवीन जीवनकण तयार करणे होय. ह्या सेंद्रिय पदार्थाचे कसे जीवनकण होतात, ह्याविषयी अज्ञान असल्याचे पूर्वी सांगितलेच आहे. परिमाणांवरून कारण शोधणे या तत्त्वानुसार सजीव तत्त्वाच्या घटक द्रव्यांवरून ती द्रव्ये कशी होत गेली, यांचे अनुमान करणे तूर्तच्या प्रसंगी योग्य असते. शिवाय जीवंत स्थितींत व मृत स्थितीत घटकद्रव्यांत फरक होतो व तो समजणे दुर्बोध आहे. सजीव तत्त्वाच्या घटक द्रव्यांचे पृथक्करण करू लागले असतां तें मरून जाते. मेल्याबरोबर त्या द्रव्यांत रासायनिक फरक होत जातात म्हणून मृतस्थितीत जी द्रव्ये आढळतात, ते खरे पृथक्करण नव्हें.

 जी द्रव्ये पेशी घटकावयवांमध्ये आढळतात, ती सर्व सेंद्रिय पदार्थापासून सजीव तत्त्वाच्या चांचल्यशक्तीमुळे उत्पन्न झाली आहेत. खरोखर सेंद्रियअन्नापासुन जीवनकण तयार होतात, व त्या कणांत पुनः घडामोड होऊन पेशीद्रव्यें किंवा पेशीवाढ होत असते. वनस्पतिशरीरसंवर्धनांत सजीव तत्त्वाचे घटकावयव खर्च होत असतात, पण त्याबरोबरच अनादिरसापासून ते घटकावयव नवीन तयार होतात. जोपर्यंत सजीव तत्त्व जिवंतस्थितींत असते, तोपर्यंत त्यामध्ये सारखे फरक होत राहतात, तसेच इतर श्वासोच्छ्वासादि क्रियेमुळे रासायनिक फरक सेंद्रियपदार्थात होत असतात. ह्या फरकांचा परिणाम जीवनकणवर्धनांत होऊन वनस्पतिघटकद्रव्ये उत्पन्न होतात.

 पेशीघटना: —प्रथम ज्या पेशींत ही द्रव्ये तयार व्हावयाची असतात, त्यांत सजीव तत्त्वे व मधून मधून जडस्थाने आढळतात. सेंद्रिय अन्नापासून