पान:वनस्पतिविचार.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१३ वे ].    क्षार, कार्बन् वायू व हरितवर्ण शरीरें.    ११३
-----

अथवा अमूक एका विशिष्ट अवयवाची जरूरी नसते. ही गोष्ट खरी की, पानांमध्ये सात्विक सेंद्रिय पदार्थांप्रमाणे नायट्रोजनयुक्त पदार्थ अधिक तयार होतात. क्षुद्र वर्गापैकी आळंब्या ( Fungoid plants ) सुद्धां नायट्रोजन सेंद्रिय पदार्थ तयार करतात. त्यांमध्ये हरितवर्ण शरीरे असत नाहींत. ह्यावरून हरितवर्ण शरीरांची ते तयार करण्यास आवश्यकता नसते. कांहीं वनस्पतींमध्ये हे नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थ प्रकाशामुळे अधिक तयार होतात असे ठरत आहे, पण त्यावरून प्रकाशाची जरूरीच आहे, असा साधारण नियम करिंता येणार नाही. अजून ह्यासंबंधी अधिक प्रयोग झाले पाहिजेत.

 हरितवर्ण शरीरें सूर्यप्रकाशाकडे वळलेली असून त्यांमधील सजीव तत्त्व आपणांस योग्य प्रकाश पाहिजे तितका घेण्याची व्यवस्था करिते. जेव्हां सूर्यप्रकाश मंद असतो, अशा वेळेस अधिक हरितरंजक कण उघडे राहून सूर्यप्रकाशाचा पूर्ण फायदा घेतात. पानाचे पूर्ण पत्र सूर्यप्रकाशाकडे वळते खरे, पण ज्या वेळेस सूर्यप्रकाश अति कडक असतो, त्यावेळेस हरितवर्ण कण किनाऱ्याकडे वेगवेगळे न राहतां आतील बाजूस जाऊन, त्यांचे पुंजके बनतात. अशा रीतीनें सजीव तत्त्व, प्रकाशाची कडकपणा हरित वर्ण शरीरांवर होऊ न देतां आपलें इच्छित कार्य करून देते. कडक उन्हांत पानाची पत्रे पूर्ण उघडी न राहतां वळविलेली असतात. ह्याचे कारण सर्व भाग सूर्यप्रकाशाकडे उघडा असण्याची जरूरी नसून जितके सूर्यकिरण पाहिजे असतील, तितके पानांवर पडण्याची तजवीज सजीव तत्त्व करीत असते. हरितवर्ण कणाचे पुंजके बनविणे अथवा त्यांच्या वेगळ्या सारख्या रांगा तयार करणे वगैरे, कमी अधिक प्रकाशाच्या कडकपणावर अवलंबून असते.

 आतां आपण सुर्यकिरण जेव्हां पानावर पडते त्या वेळेस त्याची काय स्थिति होते हे पाहूं. सूर्यकिरण पानांवर पडल्याचरोबर परावर्तन * होऊन त्याचे निर्-

-----

 * पावसाळ्यांत आकाशांत इंद्रधनुष्य जेव्हां दृष्टीस पडते, त्या वेळेस त्याचे निरनिराळे रंग फारच मजेदार दिसतात. हे इंद्रधनुष्यांत दिसणारे निरनिराळे रंग सूर्यप्रकाशाच्या परावर्तनामुळे उत्पन्न होतात. प्रकाशाचा प्रत्येक किरण परावर्तन पावल्यास असले रंग उत्पन्न होतात. परावर्तनास योग्य जागा असली म्हणजे, हे रंग आपोआप दिसू लागततात. प्रकाशासंबंधी कल्पना अशी आहे