पान:वनस्पतिविचार.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

होऊन त्यापासून सात्विक ऐंद्रिय पदार्थ तयार होतात. खरोखर विघटीकरण होणे फार सोपे असते; पण त्यापासून पुनः मिलाफ होऊन नवीन पदार्थ बनणे म्हणजे मोठे कठीण काम असते. प्रयोगशाळेत पदार्थाचे पृथक्करण फार लवकर करितां येते; पण पुनः त्या वेगवेगळ्या वस्तूंपासून पूर्वीसारखा पदार्थ बनविणे हे दुर्घट काम आहे. सूर्यप्रकाश असे पदार्थ बनविण्यास वनस्पतींच्या हरितवर्ण शरीरांत एक शक्ति उत्पन्न करून त्यापासून ही कार्ये घडवून आणतो. प्रथम कार्बन आम्लाचे विघटीकरण होते, व त्यापासून त्याचे घटकावयव कार्बन एक भाग व दोन भाग ऑक्सिजन असे वेगळे होतात. पाण्याचे घटकावयव एक भाग ऑक्सिजन व दोन भाग हायड्रोजन असे वेगळे होऊन पहिल्याशी त्यांचा रासायनिक संयोग होतो, व साखर अथवा साखरेसारखें सत्व तयार होऊन उरलेला ऑक्सिजनवायु हवेमध्ये मोकळा सोडिला जातो.

 नायट्रोजनयुक्त पदार्थ बनण्यास हरितवर्ण शरीरांची अप्रत्यक्ष जरूरी असते. नायट्रोजनयुक्त क्षारापासून नायट्रिक आम्ल वनस्पति शरीरांत तयार होते. नायट्रोजन क्षार मुळातून खोडांत व खोडांतून वरचे बाजूस जात असतात. वर जात जातां त्यांचे आम्ल तयार होत असते. वनस्पतिशरीरांतील इतर सेंद्रिय आम्लांचा नायट्रोजन-क्षारांवर परिणाम होऊन त्यापासून नायट्रिक आम्ल तयार होते. पानांत तयार झालेल्या सात्विक सेंद्रियपदार्थांशीही नायट्रिक व सल्फ्यूरिक आम्लें संयोग पावून त्यापासून नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थ तयार होतात.

 नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थ बनण्याविषयीं दुसरी एक कल्पना अशी आहे की, प्रथम जमिनीत अमोनियाक्षारापासून नायट्रेट्स् तयार होतात. ह्या स्थितीत ते शोषिले जाऊन वनस्पतिशरीरांत पुनः त्यापासून अमोनिया उत्पन्न होऊन सात्त्विक सेंद्रिय पदार्थावर आपला अंम्मल गाजविण्यापूर्वी तो अॅमिडो अॅसिड ( amido-acid ) तयार करतो. हे अॅमिडो-अॅसिड सात्त्विकपदार्थाशी मिसळून नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थ बनतात. सात्विक, सेंद्रिय पदार्थ ज्या अर्थी हरित रंजक शरीरांकडून बनविले जातात, त्याअर्थी अप्रत्यक्ष रीतीने त्यांचा नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थांशी संबंध येतो. बाकी नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थ स्वतंत्र रीतीने तयार होतात. त्यास सूर्यप्रकाशाची