पान:वनस्पतिविचार.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१०८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

पाण्यांतून उगवणारी झाडे पाण्यांतूनच कार्बन् आम्लाचे शोषण करतात. त्यासही सूर्यप्रकाशाची जरूरी असते. बाह्यत्वचेच्या भित्तिका पातळ असल्यामुळे कार्बन आम्लास आंत शिरण्यास सुलभ पडते. पाणवनस्पती आपल्या शरीराच्या वाटेल त्या भागांतून पाण्याच्या साहाय्याने वायु अथवा घनद्रव्यें विरघळलेल्या स्थितीत शोषण करू शकतात. ही द्रव्ये व पाणी मुळांतून

शोषिली पाहिजेत असा निर्बध नाही. ज्या वनस्पतींची मुळे जमिनीत शिरून कोंब हवेत वाढतात, अशामध्ये श्रमविभाग स्पष्ट असते. जमिनीतून निरिंद्रिय द्रव्ये पाण्याबरोबर मुळांच्या द्वारे घेतली जातात; पण पाने अथवा पानांसारखे हिरवे भाग यांकडून वायु शोषिले जातात. येथे दोन्ही, मुळ्यांची व पानांची, कामें एकाच भागांत होत नाहीत.

 प्रयोगांती असे सिद्ध झाले आहे की, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅलशियम व लोह ह्या चार धातु कोणत्या ना कोणत्या प्रमाणांत जमिनीत असल्या पाहिजेत. कारण, त्यांशिवाय वनस्पतीची वाढ चांगली होत नाहीं. ह्या धातु आवश्यक आहेत खऱ्या, पण त्यांचे अस्तित्व वनस्पतिशरीरांत केवळ धातु असे आढळणार नाहीं. पण निरनिराळ्या रूपांत म्हणजे आम्लें अथवा क्षार ह्या स्थितीत त्या सांपडतील. शिवाय ह्या धातूचा अमुक एक भाग अमुक एक उपयोगाचा आहे, असे सांगता येणार नाही. पण त्यांचा प्रत्यक्ष नाहीं तरी अप्रत्यक्ष उपयोग असतो ह्यांत संशय नाही. ज्या जमिनींत लोखंडाचा अंश बिलकुल नाहीं, त्या जमिनीत बी पेरिले असतां ते उगवून त्यापासून चांगला रोपा तयार होत नाही. पाणी किंवा इतर द्रव्ये जमिनीत पुष्कळ असली, तथापि आवश्यक लागणाऱ्या लोखंडाच्या अंशाखेराज वनस्पतीमध्ये जोम येत नाही. पानांत असणारी हरिद्वर्ण शरीरे लोखंडाच्या अभावामुळे तयार होणार नाहींत. खरोखर हरिद्वर्ण शरीरे तपासून पाहिली, तरी त्यांत लोखंडी अंश यतकिंचितही नसतो; पण तो असल्याखेरीज हरिद्वर्ण शरीरेंच बनत नाहींत. म्हणजे ही शरीरें बनण्यांत कांहीं तरी लोखंडाचा अप्रत्यक्ष उपयोग होत असतो. हे कसे होते वगैरेसंबंधाने अजून आपले अज्ञान कायम आहे. असा एखादा दिवस येईल की, ह्या सर्व गोष्टींचाही उलगडा होऊन जाईल. पूर्वी ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्यांपैकी बऱ्याच प्रस्तुतकाली माहीत झाल्या आहेत. नेहमी प्रयोग व तत्संबंधी विचार चालले पाहिजेत. लोखंडाच्या अभावे हिरवा रंग न झाल्या